Home Blog Page 47

चांदी करत आहे एकामागून एक विक्रम, दिवाळीपर्यंत किमती जातील १.३० लाखांच्या पुढे!

0

चांदीची चमक आजकाल गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. सतत विक्रम मोडणाऱ्या चांदीच्या किमती आता नवीन शिखरांकडे वाटचाल करत आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या दिवाळीपर्यंत चांदीची किंमत १.३० लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. हा अंदाज केवळ गुंतवणूकदारांसाठीच नाही, तर सामान्य लोकांसाठीही एक मोठा संकेत आहे.

केडिया अ‍ॅडव्हायझरीजचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या मते, दिवाळीपर्यंत चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. चांदीची किंमत १ लाख २५ हजार रुपयांवरून १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यांनी यामागील सर्वात मोठे कारण जागतिक बाजारपेठेतील तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने अलीकडेच ३७ डॉलर प्रति औंसची पातळी गाठली आहे, जी एक महत्त्वाची कामगिरी आहे. यासोबतच, अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी झाल्यामुळे औद्योगिक मागणी वाढली आहे. स्वच्छ ऊर्जा, ५जी तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहने (EVs) यासारख्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये ५३-५६% पर्यंत चांदी वापरली जाते, ज्यामुळे त्याची मागणी सतत वाढत आहे. अजय केडिया म्हणाले की सध्या सोन्याचे चांदीचे प्रमाण ९१ च्या जवळ आहे, जे दर्शवते की सोन्याच्या तुलनेत चांदी अजूनही गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, हे प्रमाण क्वचितच ९० च्या वर होते आणि जेव्हा ते खाली येते तेव्हा चांदीच्या किमती वाढतात. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या अलीकडील अहवालानुसार, चांदीचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणि मागणी वाढल्याने चांदीची तूट असल्याचे हे पाचवे वर्ष आहे. या तुटीमुळे किमती आणखी मजबूत झाल्या आहेत. चांदीमध्ये गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यात एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूर्वी, जिथे फक्त धनतेरस किंवा अक्षय्य तृतीयेसारख्या प्रसंगी चांदी खरेदी केली जात असे, आता लोक त्याकडे गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत आहेत. लहान गुंतवणूकदार देखील डिजिटल चांदी आणि ETF द्वारे त्यात सहभागी होत आहेत. म्युच्युअल फंडांनी मल्टी-अ‍ॅसेट फंडमध्ये चांदीचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे.

केडिया म्हणतात की या वर्षाच्या अखेरीस, विशेषतः दिवाळीपर्यंत चांदीचे दर १.३० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. गेल्या ६० दिवसांत चांदीने २४% परतावा दिला आहे, जो इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूपच जास्त आहे. औद्योगिक मागणी, पुरवठ्याचा अभाव आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या आवडीमुळे चांदीतील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, सोन्यापेक्षा चांदी हा परताव्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. तज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या दिवाळीत, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांदीवर लक्ष ठेवा. चांदीच्या किमती स्वतःचे रेकॉर्ड मोडू शकते. ती एकामागून एक रेकॉर्ड बनवू शकते.

पुन्हा पुढे ढकलण्यात आले अ‍ॅक्सिओम मिशन-४, आज संध्याकाळी उड्डाण करणार होते शुभांशू शुक्ला

0

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न सध्या स्थगित करण्यात आले आहे. अभियंत्यांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमधील गळती दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मागितल्यामुळे शुभांशू आणि इतर ३ जणांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन सध्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

स्पेसएक्सने घोषणा केली की ते पोस्ट-स्टॅटिक बूस्टर तपासणी दरम्यान आढळलेल्या द्रव ऑक्सिजन गळतीची दुरुस्ती करण्यासाठी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेच्या फाल्कन-९ लाँचला “मागे हटवत” आहे. स्पेसएक्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पोस्ट-स्टॅटिक फायर बूस्टर तपासणी दरम्यान आढळलेल्या LOX गळतीची दुरुस्ती करण्यासाठी टिमला अतिरिक्त वेळ देण्यासाठी स्पेसएक्स बुधवारी अ‍ॅक्स-४ च्या फाल्कन ९ लाँचपासून माघार घेत आहे.” स्पेसएक्सने असेही म्हटले आहे की, “हे पूर्ण झाल्यानंतर आणि रेंजची उपलब्धता मिळाल्यानंतर, आम्ही नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर करू.”

शुभांशू शुक्ला सुमारे ४१ वर्षांनी भारतीय म्हणून अंतराळात जाणार होते. आता आपल्याला यासाठी आणखी वाट पाहावी लागेल. यापूर्वी राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या इंटरकॉसमॉस कार्यक्रमाद्वारे ८ दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली होती.

लखनऊमध्ये जन्मलेले शुभांशू शुक्ला हे भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) आणि नासा समर्थित अ‍ॅक्सिओम स्पेसच्या व्यावसायिक अंतराळयानाचा भाग आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, बुधवारी संध्याकाळी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून १४ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या प्रवासासाठी निघणार होते.

https://x.com/SpaceX/status/1932599956336173058?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1932599956336173058%7Ctwgr%5E1f58f15cd676eb573ec14e7178f6afb9292a4a9c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Findia%2Faxiom-04-mission-postponed-launch-sending-first-indian-gaganyatri-shubhanshu-shukla-iss-spacex-falcon-9-3335960.html

१० ऑक्टोबर १९८५ रोजी जन्मलेले शुभांशू राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये सामील होण्यापूर्वी सिटी मोंटेसरी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यांना २००६ मध्ये भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांना सुखोई-३० एमकेआय, मिग-२९, जग्वार आणि डोर्नियर-२२८ यासह विविध प्रकारच्या विमानांवर २ हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IIS), बंगळुरू येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमटेक पदवी देखील मिळवली आहे.

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची २०१९ मध्ये गगनयान मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीर संघात इतर अधिकाऱ्यांसह निवड झाली होती. हे गगनयान २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा हा अंतराळ प्रवास भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणाकडे परतण्याचे प्रतीक मानला जात आहे, कारण ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थेच बिगुल अजित पवार यांनी फुकलं; कार्यकर्त्यांना दिले हे आदेश: अजित पवार

0

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय गणिते लक्षात घेता गेली ३ दशके सुरू असलेली युती आणि आघाडीची गणिते अविभाज्य भाग बनली असताना ध्येय गाठण्यासाठी सत्ता आवश्यक असल्याचा सल्ला देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सदस्य नोंदणी व आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणती काळजी घ्यायची याबाबत सल्ला देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना देखील दिल्या. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेलं आहे. आता जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जावू द्यायचा नाही. तशा पद्धतीने आपल्या सगळ्याचं काम सुरू झालेलं आहे. हा विकास रथ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवायचा असून या राज्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्यासंख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी भाषणात अजित पवारांनी विविध मुद्य्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करतानाच, त्यांच्यावर निधी देत नसल्याच्या सततच्या होणाऱ्या आरोपालाही स्पष्टपणे उत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, ”कधीकधी काही काहीजण अशा बातम्या सोडतात, की अजित पवार पैसे सोडत नाहीत. अरे पैसे सोडत नाही.. काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय? शेवटी राज्य सरकराने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही २० ट्कके सोडतो, दुसऱ्या तिमाहीत ४० ट्कके सोडतो, तिसऱ्या तिमाहीत ६० टक्के सोडतो. नंतर ८० टक्के आणि शेवटच्या महिन्यात १०० टक्के. अशा पद्धीतचे ते नियोजन असतं.”

तसेच ”मागील मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याचेवळी लक्षात आलं की, अशाच पद्धतीने अनुसूचित जातीला देखील दिलं पाहीजे. कारण, आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता. आम्ही सांगितलं की पुढील कॅबिनेटमध्ये हा विषया आला पाहीजे.”

याचबरोबर, ”आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या महायुती सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचंही काम केलं आहे. अनेक कार्यकर्ते, सहकारी आहेत शेवटी आपल्याला काम करायचं आहे. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेलं आहे. आता जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जावू द्यायचा नाही. तशा पद्धतीने आपल्या सगळ्याचं काम सुरू झालेलं आहे.” असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.

याशिवाय, ”आज आपल्या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यात होत असला, तरी राज्याच्या आणि देशाच्या इतरही भागात जिथं जिथं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ते देखील आजचा हा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे.” अशी माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिली.

अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना या सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने सत्तेसाठी त्यांनी भाजपसोबत तडजोड केले असल्याचा आरोप केला जातो. आज पुण्यामध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्येय गाठण्यासाठी सत्ता आवश्यकच असल्याचा सल्ला पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना देखील दिल्या.

नमाज पठणानंतर सारसबाग गणपती मंदीर परिसरात मांसाहार सेवन? मेधा कुलकर्णी प्रचंड संतप्त पालिकेचा हा निर्णय

0

सारसबागेतील सिद्धिविनायक मंदीर परिसरात मुस्लीम समाजाने मांसाहारचे सेवन केले, असा दावा भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. तसंच या प्रकारानंतर “कोणी हेतुपुरस्सर अशा गोष्टी करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार असेल, तर हिंदू समाज सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.” असे म्हणत कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, कुलकर्णी यांच्या संतापानंतर पुणे महापालिकेकडून सारसबागेत खाद्य पदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत बोलताना खासदार कुलकर्णी म्हणाल्या, सारसबागेचा परिसर हा देवस्थान ट्र्स्टचा परिसर आहे. ती जागा महापालिकेने भाडेतत्वावर घेऊन बाग केली आहे. तिथे तळ्यातील गणपती परिसरात मांसाहार करणं हा आमच्या धर्माचा अपमान आहे. म्हणजे तुम्ही इतर बागांमध्ये असे काही करणार नाही, पण हेतुपुरस्पर तुम्ही इथे याल आणि मांसाहर कराल? आमचे सिद्धिविनायकाचे मंदीर तिथे आहे. तळ्यातील गणपती आहे. हा संपूर्ण परिसर पेशवेकालिन आहे. त्यामुळे इथे असे काही घडू देणार नाही.

याचसाठी आम्ही पत्र दिले होते, त्यानंतर महापालिकेने इथले पावित्र्य राखण्यासाठी जी भूमिका घेतली त्यासाठी अभिनंदन करेल. आम्हाला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे चांगले लोकं आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहेच. परंतु जे मुद्दाम इतर धर्मीयांवर टार्गेट करण्याचा कार्यक्रम करत असतील तर हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि ते सडतोड उत्तर देण्यास सक्षम आहेत, असाही इशारा खासदार कुलकर्णी यांनी दिला.

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र सुप्रियाताईं थेट बोलल्या; अजितदादाशी पवित्र नातं जन्मापासून भातुकुलीचा खेळ नाही हे राजकारण!

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर आज वर्धापनदिनाच्या निमित्ताने सगळंच चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा सबंध महाराष्ट्राला होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमांमध्ये या विलीनीकरणाबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपण पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जयंत पाटलांचं भाषण झालं, त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. दिल्लीवरून परत आल्यावर शरद पवार यांच्या सोबत याबाबत चर्चा करणार आहे. जयंत पाटील हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत.

मागील सात वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही. मात्र त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील तर ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यावर विचार केला जाईल, असे खासदार सुळे म्हणाल्या.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे किंवा कोणी कोणाबरोबर एकत्र जायचं, हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. मात्र या चर्चा कॅमेरावर होत नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझा आणि अजित पवारांचा प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतर येत नाही आणि पवार कुटुंब म्हणून कालही आणि आजही आम्ही एकत्रच आहोत. यात काही वाद नाही.

माझ्यावर आणि पवार कुटुंबीयावर झालेले संस्कार आहेत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. राजकीय लाईन काही घ्यायची असेल तर दादाला आणि मला दोघांसाठी हा काही बहीण भावांचा खेळ नाही आणि भातुकलीचा खेळ नाही. हे राजकारण आहे. एकत्र येण्याबाबत जो काही निर्णय होईल, तो लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितले.

शरद पवारांचीही ‘लाडक्या बहिणीं’ना ही मोठी ऑफर;, स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी केली मोठी घोषणा…. अन्य पक्षांची मोठी गोची?

0

महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिण योजना लागू झाल्यापासून विरोधकांना या मुद्द्यांना कसं टॅकलं करायचे ही समस्या असतानाच राजकारणातील भीष्म पितामह समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी या समस्येवर एक रामबाण उपाय शोधला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन आज साजरा होत असतानाच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार गटातर्फे पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आणि विरोधका ंकडे असलेले मुद्दे या सर्व गोष्टींचा विचार करून सध्या कालीन राजकारणाचा विचार करता विरोधातील कार्यकर्त्यांना बुष्ट देण्याच्या हेतूने शरद पवार यांनी या मेळाव्यात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन महिलांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मुलींना सैन्यात संधी मिळताच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने चांगले काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व दाखवतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “एक काळ असा होता की पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि भारत हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा देश म्हणून ओळखला जात होता. आज आपले पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्याशी संबंध चांगले नाहीत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मोठा त्याग केला, पण तो बांगलादेशही आज आपल्यासोबत नाही. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी सुसंवादाची परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे.”

“राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डावे पक्ष असोत किंवा इतर पक्ष, सर्वांनी एकत्र येऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण करायला हवा. कोणी आले किंवा गेले तरी फरक पडत नाही. आपण एकसंघ राहिलो तर सत्ता मिळते, हा अनुभव आहे. जयंत पाटील यांनी गेल्या आठ-दहा वर्षांत अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. त्यांनी नव्या पिढीला संधी देण्याची सूचना केली आहे. तुम्ही त्याला विरोध केला. जयंत पाटील यांच्याबाबत निर्णय घेताना पक्षातील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. राज्यातील तालुका पातळीवर नवे नेतृत्व उभे केले जाईल,” असेही शरद पवार यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या, याचा निर्णय जिल्हा नेतृत्व घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालyanनंतर नव्या नेतृत्वाबाबत निर्णय घेतला जाईल. पुढील तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

कोथरूडमध्ये ना. चंद्रकांतदादा पाटीलांच्या हस्ते संत पूजन व पारमार्थिक साहित्य वाटप; माऊली महाराज कदम यांचे भावस्पर्शी कीर्तन

0

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड परिसरातील दिंड्या आणि भजनी मंडळांसाठी संत पूजन व वारी साहित्य वाटप सोहळा राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे भक्तिभावात व उत्साहात पार पडला.

हा सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि गिरीश खत्री (अध्यक्ष, शिवस्व प्रतिष्ठान) यांच्या संयोजनात संपन्न झाला. कार्यक्रमात वारकऱ्यांना वारीच्या प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या टेंट, स्लीपिंग बॅग, टाळ, ताडपत्री, सतरंज्या, प्रवासी बॅग यांचे वाटप करण्यात आले.

मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी या वेळी भावना व्यक्त करताना सांगितले, “अशा प्रकारच्या साधनेतून एक वेगळ्या प्रकारचा अध्यात्मिक आनंद मिळतो. आपले संत ‘देण्यातच आनंद असतो’ असे सांगून गेले, आणि आजच्या कार्यक्रमातून तो आनंद अनुभवल्यासारखं वाटतं. आयुष्यभर साधना करणाऱ्या संतांचे पाद्यपूजन करण्याचा योग हा पूर्वपुण्याईमुळेच मिळतो, असे मी मानतो.”

यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की,“२१ जून रोजी योगदिनाच्या दिवशी, दिंड्या पुण्यात मुक्कामी असताना सामूहिक योगासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.”

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे प्रभावी कीर्तन ठरले. त्यांनी आपल्या कीर्तनातून वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व उलगडून सांगितले.“वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ती अंतःकरणात घडणारी भक्तीची स्फुरण देणारी यात्रा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी बोलताना संयोजक गिरीश खत्री म्हणाले,“या कार्यक्रमाचा उद्देश समाजाला चांगली दिशा देणाऱ्या संतांचे पाद्यपूजन व्हावे हा आहे. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून, यंदाही वारकऱ्यांसाठी उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले. आम्ही हे सर्व मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या पाठबळामुळेच करू शकलो. ते आमच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, हे आम्हा सर्वांसाठी मोठा आधार आहे.”

कार्यक्रमास ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, तसेच पंढरपूर, देहू, आळंदी आदी देवस्थानांचे प्रमुख प्रतिनिधी, कोथरूडमधील विविध भजनी मंडळे, दिंड्यांचे प्रमुख आणि मोठ्या संख्येने वैष्णव भक्त उपस्थित होते. संपूर्ण परिसरात विठुनामाचा जयघोष आणि भक्तिरसाचं वातावरण अनुभवायला मिळालं.

आमदार चंद्रकांतदादा पाटील माणसे जोडणारी ‘मिसिंग लिंक’ची नाळ: ‘स्नेहवेली’चा आधारवड

0

कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत (दादा) पाटील यांच नाव घेतलं की एक आपुलकीचा आस्थेचा आणि मायेचा चेहरा समोर येतो…. कारणही तसंच भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाल्यापासून कार्यकर्त्यांवरती जीव लावणारा पहिला नेता याच ध्येयी याच डोळी तीन दशकांपासून उपेक्षित चेहऱ्यांना पाहायला मिळाला. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या स्नेहजीविधातांनी घराघरात आपली स्नेहवेल अशाप्रकारे रोपण केली आहे की आज या स्नेहवलीचा आधारवड कधी झाला हे लाभार्थी लोकांना उमगलेच नाही. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त विविध विकासकामे आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली त्याबरोबरच पक्ष आणि कार्यकर्त यांची तुटलेली नाळ जोडण्यासाठी चंद्रकांत दादा जणू ‘मिसिंग लिंक’ झाले आहेत. आजमितीला कोथरूड मतदार संघामध्ये पदाणे आणि संबंधाने राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या नेतृत्वांपेक्षा माणसे जोडणारी चंद्रकांत दादांची ‘मिसिंग लिंक’ची नाळच ‘स्नेहवेली’चा आधारवड वाटत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर वैश्विक संकट कोविडच्या काळामध्ये या स्नेहवलीच्या रोपणाचा शुभारंभ झाला. दोन-तीन दशक या विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या घराची दारे बंद झालेली असतानाच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील गरजवंतांसाठी या कठीण काळामध्ये अहोरात्र आणि कोणतेही अपेक्षा न करता विविध प्रकारची कामे करण्यास सुरुवात केली. यामध्ये वस्ती विभागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर विलीनीकरण शक्य नसल्याने या गरजेवर मात करण्यासाठी अध्ययावत सुविधा असलेले 80 क्षमतेचे क्वारंटाईन सेंटर सुरू केले. संपूर्ण मतदारसंघातील सोसायटीमध्ये निर्जंतुकीकरण स्टॅन्ड अन् घरकाम महिला तपासणी यांचे नियोजन करून नित्यक्रम सुकर करण्याचे काम केले. त्याबरोबरच एकल सदस्य असलेल्या घरामध्ये भोजन योजना अन् अन्नधान्य किट वितरित केल्यामुळे या कठीण काळामध्ये नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करणे शक्य झाले.

जागतिक महामारी कोरोनाचा काळ सरल्यानंतर रिक्षा चालक मदत म्हणून 6000 सीएनजी कूपन देऊन रिक्षा व्यवसाय पूर्व पदावर आणण्यास मदत केली. असंघटित कामगार मजूर यांच्यासाठी मोफत नाष्टा, जनसेवा रुग्णालय, फिरते रुग्णालय, नाममात्र किमतीत दिवाळी फराळ या कोरोना काळात सुरू झालेल्या उपक्रमांना आजही उत्साही प्रतिसाद मिळत असल्याने अविरत सुरू आहेत. वस्ती विभागातील महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून आजपर्यंत 700 महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले असतानाच या उदयमुख उद्योजकांना मदत करण्यासाठी बचत गट व वैयक्तिक व्यवसाय वृद्धीसाठी १ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली असून आजपर्यंत 500 महिलांनी लाभ घेतला. याबरोबरच वार्षिक 3500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही सुरू आहे. याबरोबरच ‘सुमक्तर्ष’ या उपक्रमांतर्गत 20% सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना जीवन आवश्यक कडधान्य व मिठाई वाटप केले जाते. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी अत्यंत स्तुत्य ‘मानसी’ प्रकल्प सुरू करण्यात आला असून 15 ते 20 वयोगटातील मुलींसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी, औषधे व पौष्टिक आहार, योगासने, प्रशिक्षण वर्ग, व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कामही केले जाते. मानसी प्रकल्पाच्या उत्साही प्रतिसादानंतर पुढचे पाऊल म्हणून ‘सुखदा’ प्रकल्प वस्ती विभागातील गरोदर महिलेसाठी सुरू करण्यात आला आहे. सूक्ष्म नियोजित पोषण आहार, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, तपासण्या, आरोग्य तपासणी व नामांकित दवाखान्यांमध्ये प्रस्तुतीची सेवा देण्यात येते यामध्ये 136 महिलांची यशस्वी प्रस्तुती करण्यात आली आहे. न याबरोबर 80 महिलांना गोखले बिजनेस बे रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून 13500 रुपयांच्या मोफत तपासण्या करण्यात येतात. मेमोग्राफी मशीन (ब्रेस्ट कॅन्सर तपासणी), उपचारातील रुग्णांना शासकीय योजना सीएसआरच्या माध्यमातून वैद्यकीय मदतही केली जाते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कुमारिकाचे वैवाहिक आयुष्य सुकर होण्यासाठी नववधूंना ‘झालं’ (१ग्राम सोन्यासह) देण्याचा अभिनव उपक्रम सुरू असून 500 पेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला आहे. 7000 कुमारिकांसाठी मोफत कापड अन् शिलाई, 40000 महिलांना मोफत सहली (कोल्हापूर +बाळूमामा, तुळजापूर+अक्कलकोट, गोंदवलेकर महाराज, नारायणपूर चैत्यभूमी सहल) आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निसर्ग छाया’ उपक्रम अभिनव पद्धतीने सुरू केला असून या अंतर्गत १० हजार ज्येष्ठ नागरिकांना (३ दिवस+ २ रात्री) ‘उत्साह सहल’ आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये संगीत मैफल, हास्य क्लब, योगा व पारंपरिक खेळ खेळण्यात येतात. याबरोबरच कथक, शास्त्रीय नृत्य, ढोल ताशा पथक अशा कलाकारांनाही प्रोत्साहन व भरीव मदत केली जाते.

सांस्कृतिक जपणूक होण्यासाठी ग. दि. माडगूळकर सभागृह, फिरते वाचनालय, फिरते बालवाचनालय, म्हातोबा गड संवर्धन, 65000 वृक्षारोपण, चांदणी चौक प्रकल्प या विविधांगी उपक्रमासह कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ग्राम संस्कृतीची जतन होण्यासाठी मतदारसंघातील ६ गावांमध्ये (एरंडवणे हिंगणे कोथरूड बाणेर बालेवाडी पाषाण) यात्रा उत्साहात साजरे करण्यासाठी भरीव मदत केली जात आहे. विधानसभा मतदारसंघातील पूज्य ‘वारकरी’ संप्रदायाचा मान सन्मान वाढवण्यासाठी आषाढी एकादशीच्या अगोदर पालखी सोहळा प्रस्थान करणाऱ्या संप्रदायातील संतांचे ‘संत पूजन’ उपक्रमही राबविला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी चित्रपट पाहण्याची संधी, लहान मुलांसाठी किल्ले स्पर्धा, सोसायटी नागरिकांसाठी अंतर सोसायटी नाट्य स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.

उगाचच वाडगे घेऊन भीक मागत नाही पाकिस्तान, देशातील प्रत्येक व्यक्तीवर आहे ३ लाखांचे कर्ज

0

जगात प्रत्येक व्यक्ती कर्जाची भाकरी खातो, अशा देशाची विश्वासार्हता कशी असेल? हे वाक्य पाकिस्तानला पूर्णपणे चपलक बसते. शाहबाज शरीफ यांच्या सरकारने पाकिस्तानवर इतके कर्ज ओझे लादले आहे की जर ते पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकामध्ये समान प्रमाणात वाटले, तर प्रत्येकावर सुमारे ३ लाख रुपयांचे कर्ज असेल. देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पाकिस्तान सरकारने आर्थिक सर्वेक्षण सादर केले. ज्यामध्ये असे म्हटले की पाकिस्तानचा एकूण विक्रम ७६ लाख कोटी पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा आर्थिक विकासही ३ टक्क्यांपेक्षा कमी राहू शकतो. आता तुम्हाला समजेल की पाकिस्तानची स्थिती किती वाईट झाली आहे. त्यानंतरही तो भारताशी खेळण्यासाठी चीनकडून शस्त्रे खरेदी करत आहे. पाकिस्तानच्या कर्जाबद्दल कोणत्या प्रकारचा अहवाल समोर आला आहे ते देखील आम्ही तुम्हाला सांगतो.

पाकिस्तानला अनेकदा जगातील भिकाऱ्याचे वाडगे म्हटले जाते, विशेषतः इस्लामिक देशांमध्ये. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे मदत, गुंतवणूक आणि पाठिंब्याच्या शोधात अनेकदा मित्र राष्ट्रांना भेटी देताना दिसतात, तर त्यांचे सैन्य दहशतवादावर आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर खर्च करत आहे. आता, एका अलीकडील अहवालात पाकिस्तानच्या कर्जात मोठी वाढ झाल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असताना, देशाचे राष्ट्रीय कर्ज विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की पाकिस्तानचे कर्ज अभूतपूर्व प्रमाणात वाढले आहे, जे त्याच्या आर्थिक भविष्याचे भयानक चित्र आहे.

CNN-NEWS18 च्या अहवालानुसार, मार्च २०२५ च्या अखेरीस पाकिस्तानचे एकूण कर्ज ७६,००७ अब्ज पाकिस्तानी रुपये (PKR) – म्हणजेच ७६ ट्रिलियन – पर्यंत पोहोचले आहे. देशाच्या इतिहासातील ही सर्वोच्च कर्ज पातळी आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर ते २३.१ ट्रिलियन रुपये असेल, तर डॉलरमध्ये मोजले तर ते २६९.३४४ अब्ज अमेरिकन डॉलर्स असेल. फक्त चार वर्षांपूर्वी, २०२०-२१ मध्ये, पाकिस्तानचे कर्ज ३९,८६० अब्ज रुपये होते, म्हणजेच त्या अल्पावधीत ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. एका दशकात मागे वळून पाहिल्यास, हा आकडा फक्त १७,३८० अब्ज रुपये होता. याचा अर्थ असा की एका दशकात पाकिस्तानचे कर्ज ५ पट वाढले आहे.

पाकिस्तानवर नोंदवलेले कर्ज अजिबात कमी नाही. हे पाकिस्तानच्या एकूण अंदाजे जीडीपीच्या सुमारे ७० टक्के आहे. २०२५ मध्ये पाकिस्तानचे अंदाजे जीडीपी $३९० अब्ज आहे. तर पाकिस्तानचे एकूण कर्ज $२६९.३४४ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे जर हे संपूर्ण कर्ज पाकिस्तानच्या सध्याच्या लोकसंख्येमध्ये समान प्रमाणात वितरित केले, तर प्रत्येक व्यक्तीला सुमारे ३ लाख रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ असा की सध्या पाकिस्तानी लोकांवर लाखो रुपयांचे कर्ज आहे. जे सध्याच्या परिस्थितीकडे पाहता फेडणे खूप कठीण दिसते.

आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानच्या एकूण कर्जाचा सर्वात मोठा वाटा स्थानिक बँकांचा आहे. जे ५१,५०० अब्ज पाकिस्तानी रुपये आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचे बाह्य स्रोतांकडून कर्ज २४,५०० अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढले आहे. आर्थिक सर्वेक्षणात अनेक प्रकारच्या धोक्यांबद्दल इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की जास्त किंवा खराब व्यवस्थापन केलेल्या कर्जांमुळे गंभीर असुरक्षा निर्माण होऊ शकतात.

जसे की व्याजाचा भार वाढवणे आणि दुर्लक्ष केल्यास ते दीर्घकालीन वित्तीय स्थिरता आणि आर्थिक सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकते. दरम्यान, पाकिस्तानला अलीकडेच विस्तारित निधी सुविधा अंतर्गत आयएमएफकडून १.०३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे मदत पॅकेज मिळाले आहे, जे त्याच्या तणावग्रस्त अर्थव्यवस्थेला काही दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आपला संरक्षण खर्च वाढवण्याची योजना आखत आहे, जिथे त्याला भारताविरुद्ध अपमानजनक पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानवर वारंवार विकास निधी दहशतवाद आणि लष्करी पायाभूत सुविधांकडे वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

iOS 26 : वर्षानुवर्षे जुने अँड्रॉइड फीचर आता आयफोनमध्ये, सोडवेल वापरकर्त्यांच्या समस्या

0

अॅपलच्या आयफोनसाठी नवीन iOS 26 अपडेट तुमच्यासाठी अनेक नवीन आणि उत्तम फीचर्स घेऊन आला आहे. नवीन अपडेटमध्ये एक फीचर देखील जोडण्यात आले आहे, जे अँड्रॉइडमध्ये वर्षानुवर्षे उपलब्ध आहे. या नवीन फीचरचे नाव आहे कॉल स्क्रीनिंग, हे नवीन फीचर कसे मदत करेल? आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.

आयओएस 26 अपडेटमध्ये जोडलेले हे नवीन फीचर अज्ञात नंबरवरून येणाऱ्या कॉल्सना आपोआप उत्तर देण्यास सक्षम आहे. हे फीचर कॉलरला कॉलचे नाव आणि उद्देश विचारते, दुसऱ्या व्यक्तीकडून तुमचा फोन वाजतो, तेव्हा माहिती घेतल्यानंतर.

कॉलचे नाव आणि कारण जाणून घेतल्यानंतर, तुम्ही फोन उचलायचा की नाही हे ठरवू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्पॅम कॉल्स टाळू शकता आणि या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही इनकमिंग कॉल्स अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकाल.

अॅपलने असेही सांगितले आहे की वापरकर्त्यांसाठी फोन कॉलमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन फीचर देखील जोडण्यात येईल. या फीचरबद्दल माहिती देताना, अॅपलने स्पष्ट केले आहे की समोरच्या व्यक्तीकडे आयफोन असणे आवश्यक नाही, समोरच्या व्यक्तीकडे आयफोन नसला तरीही हे फीचर काम करेल.

अॅपलने सध्या iOS 26 अपडेटचे डेव्हलपर बीटा व्हर्जन रोल आउट केले आहे, डेव्हलपर बीटा नंतर, या अपडेटचे पब्लिक बीटा व्हर्जन पुढील महिन्यात रोल आउट होण्याची अपेक्षा आहे. डेव्हलपर आणि पब्लिक बीटा व्हर्जनमधील त्रुटी शोधल्यानंतर, कंपनी दोष दूर करेल आणि स्थिर अपडेट जारी करेल.