Home Blog Page 213

राज्यात 13 वरिष्ठ आयएएस बदलले बदल्यांचा धडाका सुरुच! राहुल कर्डिलेंची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली

0

मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर बदल्यांचा धडाका सुरूच आहे. आताही राज्यातील 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि वस्त्रोद्योग खात्याच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. डॉ. प्रशांत नरनावरे यांची राज्यपालांचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. राहुल कर्डिले यांची आता नांदेड जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

कोणाची बदली कुठे झाली?

1. प्रवीण दराडे (IAS:RR:1998) यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

2. श्री पंकज कुमार (IAS:RR:2002) यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. श्री नितीन पाटील (IAS:SCS:2007) सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

4. श्रीमती श्वेता सिंघल (IAS:RR:2009) राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. डॉ. प्रशांत नरनावरे, (IAS:RR:2009) सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. श्री अनिल भंडारी (IAS:RR:2010) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. श्री पी.के.डांगे (IAS:SCS:2011) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

8. श्री एस. राममूर्ती (IAS:RR:2013) सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

9. श्री अभिजित राऊत (IAS:RR:2013) जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. श्री मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

11. श्री राहुल कर्डिले (IAS:RR:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. श्रीमती. माधवी सरदेशमुख (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13. श्री अमित रंजन (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय; यांची FCR व्दारे तपासणी अन् बोर्ड परीक्षांवर ‘ड्रोन’चीही नजर

0

मुंबई : राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेध आता विद्यार्थ्यांना लागले असून अभ्यासाची तयारीही सुरू आहे. राज्य शासनाने यंदाची बोर्ड परीक्षा अधिक गांभीर्याने घेतली असून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॉपीमुक्त परीक्षांसाठी सरकारने राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी स्थानिक गुंडगिरी व स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात. या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात  जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.

फडणवीसांची मोठी खेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीला शह? तुमचा जिल्हा, आमची जबाबदारी!; कुठे कुणाची नियुक्ती? वाचा यादी

0

भाजप महायुतीत कंट्रोल आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्याच कारण म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असला किंवा शिवसेनेचा पालकमंत्री तरीही तेथे भाजप आपल्या एका मंत्र्यांची संपर्कमंत्री म्हणून नेमणूक करणार आहे.भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा मंत्री संपर्कमंत्री म्हणून काम पाहणार आहे.

एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या ठाण्यात आणि बीड जिल्ह्यातही भाजपने संपर्कमंत्र्याची नेमणूक केलीय. त्यामुळे महायुतील दोन्ही पक्षातील नेते यावर कशा प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल. आज झालेल्या आमदारांच्या कार्यशाळेत भाजपने या नियुक्त्या केल्या आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांच्या विशेष नेमणुका करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक हे संपर्कमंत्री असणार आहेत. तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर संभाजीनगरमध्ये अतुल सावे संपर्कमंत्री असणार आहेत. मात्र यामुळे आधीच पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद अजून पेटण्याची शक्यता आहे. रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदावरून युतीत गोंधळ उडायलाय. दरम्यान भाजपने आपल्या मंत्र्यांवर संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिलीय. भाजपचा पालकमंत्री नसला तरी तेथे भाजपचा हस्तक्षेप असणार आहे.

सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भारतीय जनता पक्षाकडून विशेष नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री काम करणार आहेत. पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तीव्र संघर्ष सुरू असताना संपर्कप्रमुख हे नवे पद भाजपने निर्माण केलेले आहे. संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर धाक राहावा, यासाठी भाजपने मोठी चाल खेळल्याची चर्चा आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा शह देण्याचाही भाजपचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्यालेच मिळावे, असा राजकीय नेत्यांचे प्रयत्न असतो. सरकार स्थापन झाल्यानंत, असे मंत्रिपदासाठी आणि चांगल्या खात्यासाठी जसे प्रयत्न झाले तसे स्व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठीही नेत्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. परंतु तरीही तिन्ही पक्षातले काही नेते नाराज झाले आहेत. भाजपमधील नाराजी शमविण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी भाजपने संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण केल्याचे सांगितले जाते.

संपर्कमंत्र्यांवर कोणत्या कामाची जबाबदारी असेल?

पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असेल. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.

ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे जाऊन संपर्कमंत्री कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतील. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू असताना युतीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये वा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

जिल्हा आणि संपर्क मंत्री

गोंदिया – पंकज भोयर

रायगड – नितेश राणे

बुलढाणा – आकाश फुंडकर

यवतमाळ – अशोक उईके

वाशीम – राधाकृष्ण विखे

संभाजीनगर – अतुल सावे

बीड – पंकजा मुंडे

धाराशिव – जयकुमार गोरे

हिंगोली – मेघना बोर्डीकर

जळगाव – गिरीश महाजन

नंदुरबार – जयकुमार रावळ

मुंबई शहर – मंगलप्रभात लोढा

ठाणे – गणेश नाईक

रत्नागिरी – आशिष शेलार

कोल्हापूर – माधुरी मिसाळ

पुणे – चंद्रकांत पाटील

महायुतीत नाराजी?

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यावरून महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत गृहप्रकल्पांवर चर्चा होणार होती. यासंबंधित खाते एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे. पण तेच बैठकीला उपस्थित नव्हते.

गुन्हेगारीचं जाळं कुठपर्यंत गेले त्याचे सर्व पुरावे धनंजय देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे नवी मागणी?; बीड प्रकरणातील सर्व पुरावे कशात? 

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी विष्णू चाटेबाबत धनंजय देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. विष्णू चाटे याच्या मोबाईलमध्येच सर्व पुरावे आहेत. पोलिसांनी हा मोबाईल शोधून काढावा. त्यातील डेटा चेक करावा, तुम्हाला सर्व पुरावे सापडतील, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींची स्पेशल रिमांड घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचंही धनंजय यांनी स्पष्ट केलं आहे. धनंजय देशमुख मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

विष्णू चाटे या प्रकरणातील आरोपी आहे. त्याने त्याचा मोबाईल कुठे तरी टाकला आहे. त्यात संघटीत गुन्हेगारीचं जाळं कुठपर्यंत गेले त्याचे सर्व पुरावे आहेत. त्याच्यावर फक्त पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल न करता तो मोबाईल कसा रिकव्हर कसा होईल हे पाहिलं पाहिजे. नुसता मोबाईल सापडून फायदा नाही, त्यातील सर्व डाटा रिकव्हर झाला पाहिजे. याचे मूळ कुठपर्यंत गेलंय आणि शेवट कुठपर्यंत गेलाय हे मोबाईल सापडल्यावरच कळणार आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. तसेच आरोपींची वेगळी स्पेशल रिमांड घ्या, पुरावे आणि मोबाईल जनतेसमोर आणा आणि आम्हाला न्याय द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ

सध्या सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहेत. तपासही योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं ठरलेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांचा निरोप आला किंवा सुरेश धस म्हणाले तर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांना फाशीच द्या

माझी भूमिका स्पष्ट आहे, या खुणातील आरोपी आहेत त्याना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. ज्याने आरोपींना पाठवलं, कार्यकर्ते ज्यांचे आहेत, ज्यांचे या लोकांशी संबंध आहेत, त्या सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

चौकशी झाली पाहिजे

अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अंजली दमानिया यांनी आरोपाचे पुरावे दिले आहेत. त्या न्याय मागत आहेत, त्यामुळे दोषीवर कारवाई व्हावी. आम्ही आरोपीला फाशी द्या म्हणतोय. त्याचप्रमाणे अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत, त्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करावा. सुरेश धस यांनी पुरावे दिले होते, त्यावर समिती नेमली. त्याचप्रमाणे अंजली दमानिया यांच्या आरोपांवर चौकशी व्हावी. हे प्रकरण नेमकं काय आहे, याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे, असंही ते म्हणाले.

महंत शिवाजी महाराज भेटणार

दरम्यान, भगवान गडाचे महंत शिवाजी महाराज हे भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहितीही धनंजय देशमुख यांनी दिली. परवा नारायण गडावर गेलो होतो. दर्शन घेतलं. महंत शिवाजी महाराजांशी तेव्हा फोनवर बोलणं झालं होतं. आज ते भेटायला येणार आहेत. त्यांचा तसा निरोप आला आहे. मी एक दोन दिवसात येणार आहे, असं ते मला बोलले होते. त्यानुसार ते येत आहेत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.

अंजलीताई ‘बदनामियां’च्या बुद्धीची किव येते, आम्ही शांत बसलो याचा अर्थ… अखेर धनंजय मुंडे संतापले

0

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझं मीडियाला चॅलेंज आहे. अंजली बदानमियांनी.. बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अंजली दमानियांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. “जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवली गेली. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदत वाढ दिली. कोणी दोन वेळा मुदत वाढ देईल का?” असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.

“…त्यांनी आमचे आभार मानले आहेत”

“नॅनो युरीया किंवा नॅनो डीएपीचे दर संबंध देशात समान आहे. त्यामुळे यात तफावत आहे, अमूक कोटीचा भ्रष्टाचार झाला हे म्हणणं म्हणजे जनतेला फसवणं आहे. धादांत खोटं बोलणं, त्यातून सनसनाटी निर्माण करणं. अंजलीताई आरोप करायच्या. त्यावर विश्वास राहायचा. आता तो राहिला नाही. अधिक टिकाऊ आणि सहा महिन्याऐवजी १ वर्षाची गॅरंटी देणारा, त्यातही इतर राज्यांपेक्षा २८५७ रुपयात हा पंप शासनाला पडला आहे. या पंप खरेदीत ज्या ज्या शेतकऱ्यांना पंप मिळाले त्यांनी आमचे आभार मानले आहेत”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

“दमानियाने बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला”

“कापूस साठवणूक बॅगेच्या खरेदीवर त्या बोलल्या. याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी राज्यात कापसाला भाव नव्हते. शेतकऱ्यांच्या घरात होता. कापसावर अनेकवेळा फवारणी केली त्यामुळे घरातील लोकांच्या त्वचेवर परिणाम झाला. त्यामुळे कापूस बॅगा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सिरकॉट इंडिया ही केंद्राची कंपनी आहे. त्यांनी किंमत ठरवून दिली. जी किंमत ठरवून दिली, त्यापेक्षा कमी किंमतीत बॅगा खरेदी केल्या आहेत. आता प्रत्येक गोष्टीत खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून सरकारने खरेदी करायची. त्यावेळी उचित आणि बाकी उचित नाही. त्यांना विचारून दर देईल, ते योग्य आणि नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. आजवर अनेक आरोप माझ्यावर झाले. आज ५८ वा दिवस आहे. मी आणि मी. दमानियाने बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर त्यांच्या बुद्धीची किव करावी का. त्या हुशार आहे. मला आदर आहे. जे आरोपी पकडायचे आहेत त्यांचा खून झाला म्हणाला. हा त्यांचा खोटारडेपणा बाहेर नाही आला. माझं मीडियाला चॅलेंज आहे. अंजली बदानमियांनी.. बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का?” असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

“एखाद्याचं राजकीय आयुष्य संपवणं एवढं सोपं नसतं”

“त्यांना परत राजकारणात यायचं असेल त्यामुळे न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा विषय असतो. त्यामुळे खोटे आरोप करू नका. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. थर्मल पॉवरने जी घाण केली आहे. ती घाण थर्मल पॉवरने पैसा देऊन काढावी, अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. याबाबत त्यात शासकीय पद आहे, माझ्या कंपनीत. माझ्या बायकोला बसवलं की मी बसवलं. ती २००६ची कंपनी आहे. त्या राखेमुळे सिमेंट इंडस्ट्री आलीय, रोजगार आलाय. ज्यावेळेस राख बॅगमध्ये जात नव्हत्या. तेव्हा राखेचे तळं असायचे. आमच्याकडे दोन चार तळे आहेत. ते साफ करायला नको. मे महिन्यात आल्यावर आमची परळी धुळीत दिसते. राखेत दिसतो. यावरही आरोप करायचे. ऊर्जा विभागाने म्हणावं ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणी समजू नका. आम्हाला बोलता येत नाही. आमच्याकडे काहीच नाही. मीडियात यायचं स्वत:चा प्रभाव निर्माण करणं अवघड नाही. पाच वर्ष विरोधी पक्ष होतो.

बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे. ही संवेदनशील घटना आहे. हत्यारांना फासावर लटकवणं जबाबदारी आहे. यातून वादावर वाद नको म्हणून गप्प बसतो. एक विषय झाला तर दुसरा विषय. काय करायचयं? माझी अंजली ताई बदनामीया यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचा काम ज्याने कुणी दिलं असेल त्यांना अंजली दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहे. साप म्हणून भूई थोपाटणं, मीडियातून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणं एवढं सोपं नसतं”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

कृषी क्षेत्रात AI; योजना, अनुदान, तक्रार, मदत एकाच ठिकाणी माहिती मिळणार एआयवर आधारीत शेतकरी ॲप, पोर्टलचा लवकरच श्रीगणेशा

0

राज्यात कृषी क्षेत्र घोटाळ्याच्या नकाशावर आले आहे. सध्या विविध घोटाळे आणि अनियमिततेमुळे कृषी क्षेत्र सध्या चर्चेत आहे. पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर आणि इतर घोटाळे गाजत असतानाच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमतेवर शेतकरी ॲप, पोर्टलचा लवकरच श्रीगणेशा होत आहे. सर्व योजनांची, अनुदान, तक्रार, मदत या सर्वांची एकाच ठिकाणी शेतकर्‍यांना माहिती मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्यानंतर पिकांच्या उत्पादनात वाढ होईल. मजुरीच्या खर्चात बचत करता येईल. रासायनिक खते आणि औषधांच्या वापरात कपात होईल. वेळीच रोग, कीड यांची माहिती मिळाल्याने पिकांचे नुकसान टाळता येईल. शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

समिती पण केली गठीत

शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी, कृषी योजनांची एकत्र माहिती देण्यासाठी एक खिडकी योजनेच्या धरतीवर हे एआय आधारीत शेतकरी ॲप, एआय आधारित पोर्टल सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. १५ दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे.

असा होईल फायदा

बेमौसमी पाऊस, वातावरणातील बदल, पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव याची माहिती कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून मिळेल. एआयच्या वापरामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. मजूरी आणि इतर खर्चात बचत होण्यासाठी एआयचा वापर करण्यात येईल. त्यामुळे शेती क्षेत्रात सुधारणा आणि बदल होण्यास मदत होईल.

एआयमुळे मातीतील कार्बन प्रमाण जाणून घेणे, माती परीक्षण, माती आरोग्य, तणाचा प्रकार ओळखणे, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे यासाठी कृत्रिम बुद्धीमता वरदान ठरेल. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन मोफत सेवा आणि सल्ला मिळेल. त्यआधारे शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवता येतील.

अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे

मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ही संपूर्ण पणे नियमात आणि शासनाच्या धोरणाला अनुसरून राबवली आहे. आज नाही. मागच्या ५० दिवसात त्या माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. अंजली दमानिया यांचे आरोप खोटे असल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.

“धनंजय मुंडेंकडून 280 कोटींचा घोटाळा”, दमानियांनी सांगितलेले आकडे जसेच्या तसे वाचा

0

एक कृषी मंत्री कसे पैसे खातो याचे कथित पुरावे घेऊन आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया माध्यमांसमोर आल्या. धनंजय मुंडे यांनी जुलै 2023 ते 2024 या एका वर्षात 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांनी रात्रीच्या रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आणि त्यांनी सही घेतली आणि हा प्रकार केला असा आरोप अंजनी दमानिया यांनी केला. 12 मार्चला एक जीआऱ निघाला, तेव्हा कृषी आयुक्त प्रविण गेडाम होते. नॅनो युरिआ, नॅनो डीएपीच्या 5 वस्तु खरेदीत मुंडेंनी भ्रष्टाचार केला. अजितदादा, शिंदेंची सही घेऊन मुंडेंनी ही स्कीम राबवली असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

अंजली दमानिया यांनी सांगितलं की, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले होते. राज्य सरकारलाही आदेश बंधनकारक होते. मात्र, धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांच्या कृषीखात्याने शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियमांचं उल्लंघन केलं. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आल्या. तसंच वस्तू खरेदी करताना बाजारभावाच्या तुलनेत जास्त पैसे दिले असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

“कृषी मंत्र्यांनी कृषी माल महागात खरेदी केला”

1. नॅनो युरिया : 220 किंमतीच्या 19,68,408 बॉटल विकत घेतल्या

2. नॅनो DFA : 590 रुपयाने 19,57,438 बॉटल विकत घेतल्या.

3. बॅटरी स्प्रे : 3426 रुपयाने 2,36,427 स्प्रे विकत घेतले.

4. मेटाल्डिहाईड (PI Industries Petant Product) : 1275 रुपयांनी  1,96,000 किलो विकत घेतलं.

5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 1250 रुपयांनी 6 लाख 18 हजार बॅग घेतल्या

मालाची खरी किंमत कमी?

अंजली दमानिया यांनी लाईव्ह प्रेसमध्ये याच मालाचे ऑनलाईन दर दाखवले.

1. नॅनो युरिया : 90 रुपये

2. नॅनो DFA : 269 (500 ML) रुपये

3. बॅटरी स्प्रे : 2450 ते 2946 रुपये

4. मेटाल्डिहाईड : 817 रुपये

5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 20 बॅग 577 रुपये

अंजली दमानिया यांनी हे आरोप करत धनंजय मुंडे यांनी फक्त एकाच वर्षात 160 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं म्हटलं आहे. तर या सर्व वस्तू बल्क रेटने घेतल्या आणखी स्वस्त मिळू शकतात, त्यामुळे हा भ्रष्टाचाराचा आकडा 280 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. म्हणजे एकूण खरेदीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या 70 टक्क्यांचा घोटाळा झाला असं अंजली दमानिया म्हणाल्या आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदावर ठेवण्याची काय गरज आहे असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. एकूणच हे सर्व आरोप पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

एडेलवाईस मुच्यूअल फंडातर्फे गुंतवणूकदारांसाठी ‘एडेलवाईस कंझम्शन फंड’

0

नवीन फंड ऑफर (एनएफओ) गुंतवणूकीसाठी ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान खुली

ठळक वैशिष्ट्ये:

  • २०३० पयत ग्राहकांचा खच ४.३ ट्रिलीयन डॉलरवर पोहण्याच्या अपेक्षेमुळे हा फंड भारतातील ग्राहकपयोगी वस्तू बाजारपेठेतील मुख्य, उगवत्या आणि चक्रीय प्रवाहावर आधारित संकल्पनेवर आपले लक्ष केंद्रीत करणार
  • विशिष्ट गुंतवणूक शैलीवर विसंबून न राहता हा फंड ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील दिग्गज कंपन्या, सतत वृध्दी दर्शविणाऱ्या दर्जेदार कंपन्या आणि मूल्य संधी प्रदान करणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करत जाणार
  • हालातील बाजार सुधारांमुळे आकर्षक प्रवेश बिंदू उपलब्ध झाले आहेत, कारण ग्राहक संबंधित स्टॉकच्या किमतीत महत्त्वपूर्ण घट झाली आहे

पुणे : एडेलवाईस अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडने (EAMC/EMF) गुंतवणूकदारांसाठी ‘एडेलवाईस कंझम्पशन फंड’ हा नवीन फंड आणला आहे. नवीन फंड ऑफर (एनएफओ) ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीदरम्यान गुंतवणूकीसाठी खुली राहणार आहे. वापर आणि उपभोग-संबंधित क्षेत्रांमध्ये किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत कंपन्यांवर हा फंड आपले लक्ष केंद्रित करताना प्रामुख्याने समभाग आणि समभागाशी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवलवृध्दीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एडेलवाईस म्युच्यूअल फंडाच्या एमडी आणि सीईओ श्रीमती राधिका गुप्ता म्हणाल्या, “जगातील दोन प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतातील ग्राहकपयोगी वस्तू उपभोगाच्या बाजारपेठेत आगामी काळात अतिशय वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहकांचे वाढते उत्पन्न, शहरीकरण, डिजिटलायझेशन, सुलभरित्या उपलब्ध होणारे कर्ज आणि लोकसंख्येत तरुणांचा अधिक संख्या यासारख्या लाभदायक घटकांमुळे ग्राहकरुपी व्यवसाय भारतात वेगाने भरभराटीला येण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्यामुळे पुढील अनेक दशकांच्या लाभ उठविण्याचे उद्दिष्ट एडलवाईस कंझम्पशन फंडाने ठेवलेले आहे. भारतीय शेअरबाजारात समभागांच्या किंमती सुधारुन योग्य पातळीवर आलेल्या असल्याने हा फंड अतिशय योग्य वेळी सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्रातील समभागांत प्रवेशासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे.”

दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने भारताची अर्थव्यवस्था सध्या ग्राहकपयोगी वस्तू खपांच्या लाटेवर स्वार झालेली असून त्यामुळे ग्राहकांशी संबंधित व्यवसायांमध्ये वृध्दी होत चालली आहे. ग्राहक वस्तू उपभोगामुळे भारताच्या वाढीच्या या टप्प्याचा लाभ उठवण्यासाठी मुख्य, उगवत्या आणि चक्रीय प्रवाहाशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्रामुख्याने हा एडेलवाईस कंझम्पशन फंड तयार करण्यात आलेला आहे. एफएमसीजी, ग्राहकपयोगी वस्तू, दैनंदिन आहाराशई निगडीत वस्तू, शिक्षण, आरोग्य आदी ग्राहकांशी संबंधित उपविभागांमध्ये गुंतवणूक करत हा फंड आपल्या गुंतवणूकीत विविधांगी दृष्टीकोन राखणार आहे. गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत संपत्ती निर्मितीच्या संधी प्रदान करणे, हे या फंडाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

‘एडेलवाईस कंझम्पशन फंड समभाग निवडीसाठी विशिष्ट गुंतवणूक शैलीला चिकटून राहणार नाही. आपल्या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या कंपन्या, सतत विकास साधणाऱ्या कंपन्या आणि मूल्य निवड या दृष्टीकोनातून हा फंड गुंतवणूकीसाठी कंपन्यांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. हा फंड भारतातील विविधांगी ग्राहकपयोगी वस्तूंच्या विस्तारणाऱ्या बाजारपेठेचा फायदा उठविताना निवडीसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करणाऱ्या व्यवसायांची निवड करुन त्यातच गुंतवणूक करत जाणार आहे. फंडाची क्षेत्रनिहाय आणि संकल्पनानिहाय गुंतवणूक भारताच्या आर्थिक लवचिकता आणि विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या पसंतींशी सुसंगत राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा फंड आशादायक गुंतवणूकीचा एक मार्ग राहणार आहे.

विविध श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी हा फंड गुंतवणूकीसाठी सहज उपलब्ध असून यात अगदी १०० रुपयांच्या किमान गुंतवणूकीने त्यांना शुभारंभ करता येणार आहे. भारतातील ग्राहकपयोगी वस्तूंशी संबंधित बाजारपेठ संकल्पनेवर आपले लक्ष केंद्रीत करणाऱ्या समभागरुपी गुंतवणूक पर्यायाच्या माध्यमातून आपल्या पोर्टफोलिओत वैविध्यता हव्या असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उत्तम पर्याय राहणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन श्री. ध्रुव भाटीया, श्री. त्रिदीप भट्टाचार्य आणि श्री. अमित व्होरा हे सांभाळणार आहेत

CM आले, १० दिवस झाले, तरीही निकाल न लागे; शिंदेंच्या नाराजीमागचं कारण काय? अखेर उलगडा झाला

0

मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या दरेगावच्या फेऱ्या वाढल्या आहेत. निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यानंतर खातेवाटपावरुन बरीत खेचाखेच झाली. मग पालकमंत्रिपदावरुन तणातणी पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकांनी गैरहजर राहत असल्यानं नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यांच्या नाराजीमागील कारणाचा अखेर उलगडा झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोमवारी वॉर रुमची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिले. त्यानंतर नगर विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या आढावा बैठका नियोजित होत्या. त्या बैठकांनादेखील शिंदे गैरहजर राहिले. मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती. सरकारच्या महत्त्वाच्या बैठकांना शिंदे सातत्यानं अनुपस्थित राहत आहेत. त्यामागचं कारण रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा न सुटलेला तिढा आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदांवरुन शिवसेनेत नाराजी आहे. महत्त्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहून शिंदे ती नाराजी दाखवून देत आहेत. रायगड, नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेले होते. तिथून परतल्यानंतर ते स्थगिती देण्यात आलेल्या पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लावतील, अशी अपेक्षा होती. पण दावोसहून परतून १० दिवस उलटले तरीही फडणवीसांनी २ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा पेच सोडवलेला नाही. त्यामुळे शिंदे नाराज आहेत.

रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेकडून जोरदार विरोध झाल्यानंतर दोन्ही नियुक्त्यांना स्थगिती मिळाली. रायगडचं पालकमंत्रिपद भरत गोगावले आणि नाशिकचं पालकमंत्रिपद दादा भुसेंना मिळावं अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. पालकमंत्री होण्याची इच्छा असण्यात काही गैर नाही, असं म्हणत शिंदेंनी याबद्दलची त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे.

मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर रायगड, नाशिकबद्दलचा निर्णय घेतील, असं सांगण्यात आलं होतं. पण फडणवीस मायदेशी परतून १० दिवस लोटले तरीही त्यांनी याबद्दलचा निर्णय न घेतल्यानं सेनेत अस्वस्थता आहे. पक्षातील असलेली नाराजी शिंदे वारंवार दाखवून देत आहेत. सामाजिक क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक बोलावली होती. त्या बैठकीला गैरहजर राहत शिंदेंनी संदेश दिला आहे.

‘वर्षा’ बंगल्याच्या लॉनमध्ये खरंच मंतरलेलं रेड्याचं शिंग पुरलं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा स्पष्ट खुलासा

0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोण्याचे आरोप केले जात आहेत. याआधी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत पहिला निशाणा साधला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अजून का जात नाहीयत? असा सवाल करत त्यांनी जादूटोण्याचे आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना शिवसेनेकडून रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर वर्षा बंगल्यातून टोपलीभर लिंबू सापडले होते, असा दावा रामदास कदम यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये मंतरलेल्या रेड्याचे शिंग पुरलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वर्षा बंगल्यावर येणारा मुख्यमंत्री जास्त काळ टिकू नये, म्हणून तिथे रेड्याचे शिंग पुरलं आहे, असा दावा राऊतांनी केलाय. त्यांच्या या आरोपांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पण एकनाथ शिंदे यांनी त्यावर फार जास्त बोलणं टाळलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपांना देखील शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांनी जादूटोणाबाबत केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी केवळ दोन ते तीन वाक्यात उत्तर दिलं.

एकनाथ शिंदे यांचं जादूटोण्याचा आरोपांना प्रत्युत्तर काय?

“त्यांना जादूटोण्याचा खूप जास्त अनुभव आहे. तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांना जास्त अनुभव असल्यामुळे, मला वाटतं, तुम्ही त्यांनाच विचारा की, खरं काय आणि खोटं काय. यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.