Home Blog Page 15

..तोपर्यंत ‘धनुष्यबाण’ गोठवा; शिंदेंविरोधात ठाकरेंची कोर्टात धाव; आज आज होणाऱ्या सुनावणी कडे लक्ष

0

शिवसेनेत २०२२ साली फूट पडली. एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदार घेवून बाहेर पडले आणि महायुतीत विलीन झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर दावा केला. नंतर हे प्रकरण थेट निवडणुक आयोगात गेलं. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला पक्षाच्या नावाबरोबर चिन्ह पण देवू केलं. याच चिन्हावर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. पण आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्याबाण हे चिन्ह वापरण्यापासून शिंदे गटाला रोखा, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केली आहे. शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या खटल्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे.

२०२२ साली शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर एकनाथ शिंदेंनी दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मुभा दिली. निवडणूक आयोगाने हा निर्णय मुळात असंवैधानिक आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला चिन्ह आणि नाव वापरण्यास मनाई करा. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत अंतरिम आदेश द्या, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटातर्फे वकील देवदत्त कामत यांनी २ जुलैला केली होती.

हे प्रकरण निवडणूक आयोगात असताना, ११ ऑक्टोबर २०२२ रोजी शिंदे गटाने ‘सूर्य’ आणि ‘ढाल’ ही चिन्हे सुचवली होती. त्यानंतर आयोगाने त्यांना ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिले. ठाकरे गटाने या निर्णयावर पुनर्विचार करून, शिंदे गटाला हेच चिन्ह कायम ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेले पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणीही वापरू नये, असे निर्देश द्यावेत, अशी मागणीही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, सिम्बॉल रूल्सनुसार, पक्षचिन्हाबाबतचा अंतिम निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत. मात्र, शिवसेनेच्या मूळ नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा आयोगाचा निर्णय कायद्याच्या अधिकारकक्षेबाहेरचा आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. या वादात तत्कालीन राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांनी मिळून मूळ शिवसेना आणि शिवसैनिकांची फसवणूक केली आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आगामी ‘स्थानिक’ निवडणुका अजितदादा ‘अ‍ॅक्शन’मध्ये कामाला लागा कार्यकर्त्यांना आदेश; नेमकं काय म्हणाले?

0

पुणे : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. यामध्ये राज्यातील मोठ्या महापालिकेसाठी राजकीय धुरिणांना मोठी कसरत करावी लागणार आहेत. यातच पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जनमानसात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.

पुण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीकरिता संघटना वाढीच्या सूचना दिल्या आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ‘निवडणुका जवळ आल्या आहेत, मी पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका आमच्याकडे होती. अनेक वर्ष दोन्ही महानगरपालिका सत्तेत होतो. आता आगामी निवडणुकीसाठी संघटना वाढवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.’ तर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना म्हटले की, निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल, आपण आपली प्रत्येक प्रभागात तयारी करा. पुण्यात प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवा, सदस्य नोंदणी करा, मी स्वतः पुण्यात पक्षात लक्ष घालेन, या सर्वांचा मी ऑगस्ट महिन्यात आढावा घेईन’

दरम्यान, नवीन शहराध्यक्षांना कार्यकारिणी तयार करून कामाला लागण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या. तसेच ‘निवडणुका एकत्रित लढवायच्या का यामध्ये सगळे निर्णय युतीबाबत वरिष्ठ घेतील,’ असेही पवारांनी नमूद केले आहे.

राज्य शासन शासकीय सेवेतील 300000 पदे रिक्त!; ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार

0

राज्य शासनातील मंत्रालयासह विविध विभागांतील तब्बल ३ लाख पदे रिक्त असून रिक्त पदांचा आकडा वाढतच आहे. रिक्त पदांमुळे सध्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. सद्यस्थितीत राज्य शासनातील एकूण ७.१९ लाख मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील सुमारे २ लाख ९२ हजार ५७० पदे रिक्त आहेत. नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या ५ हजार २८९ इतक्या कर्मचाऱ्यांची संख्या यात समाविष्ट केली तर हा आकडा २ लाख ९७ हजार ८५९ इतका होतो. म्हणजेच राज्य शासनातील तब्बल ३५.८३ टक्के पदे रिक्त आहेत. दरवर्षी सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या ३% जागांची त्यात भर पडत आहे. परीक्षांमधील गैरव्यवस्था आणि तांत्रिक घोळांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी, अशी मागणी होत आहे.

शासकीय भरतीचा वेग अत्यंत मंद आहे. आता मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. रिक्त पदे न भरल्याने काही अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा पदभार आहे. तर खालच्या पदावर नवी भरती न झाल्याने पदोन्नती होऊनही अनेकांना मागील १० ते १२ वर्षे खालच्या पदावरच काम करावे लागत आहे.

– विश्वास काटकर, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

लवकर नोकर भरती होत नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वाट पाहून लाखो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपते आणि त्यांना संधी मिळत नाही.

– महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

…तर आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला असून या कार्यक्रमांतर्गत आकृतिबंध, नियुक्ती नियम सुधारित करणे, अनुकंपा तत्त्वावरील भरती १०० टक्के करणे आदी उद्दिष्टे दिली आहेत.

रिक्त पदांसाठी मेगा भरती करण्याची घोषणाही फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास आवश्यक पदे भरली जातील.

‘जनसुरक्षे’मुळे विकासमार्ग खुला; प्रकल्पांना विरोध डाव्यांकडून : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

0

राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकामुळे राज्यातील विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केले. विशेष म्हणजे राज्यातील आदिवासीबहुल पण मागास असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा विकास होऊ शकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

रवींद्र चव्हाण यांनी जनसुरक्षा विधेयकापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी त्यांनी आपले मत व्यक्त केले. चव्हाण म्हणाले,”शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. चंद्रपूर, गडचिरोली या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. त्यावर तेथील आदिवासींचा पहिला हक्क आहे. या साधनसंपत्तीच्या साह्याने त्यांचा विकार होऊ शकतो. मात्र इतका काळ तो का होऊ शकला नाही, याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. याच्या मूळाशी नक्षलवाद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात नक्षली जवळपास संपलेले असताना या विधेयकाची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यावर चव्हाण म्हणाले, ”शहरांमध्ये विद्यापीठांमध्ये शहरी नक्षली आहे. ते विष पेरण्याचे काम करतात. वेगवेगळ्या प्रकल्पांना लोकांनी विरोध करणे वेगळे आणि त्यांच्या आडून अशा आंदोलनांना नक्षलींची ताकद मिळणे वेगळे आहे.” जनसुरक्षा विधेयक लोकांची आंदोलन, मोर्चा यांच्या आड अजिबात येणार नसल्याचा आणि त्यामुळेच हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला.

चव्हाण यांनी ‘जेएनपीटी’ बंदराचेही कौतुक केले. ते म्हणाले, ”जेएनपीटीसारख्या बंदराला त्याकाळात विरोध झाला असता तर आपण आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कुठेच नसतो. प्रकल्पांना विरोध म्हणजे विकासाला विरोध. प्रकल्पातील त्रुटी कमी करुन प्रकल्प पुढे घेऊन गेलो तरच विकास होईल. मात्र कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा विकासाला विरोध आहे. पुढील काळात वाढवण बंदरामुळे राज्याची अर्थव्यवस्था बदलणार आहे.”

स्थानिक निवडणुकीत महायुती एकत्रच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच उतरणार असल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, ”महायुती म्हणून जागावाटपात जिथे कमीजास्त होईल, त्याबाबत आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठरवतील. पण एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे हे तत्वत: धोरण म्हणून आम्ही स्वीकारले आहे.” जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरले नाही, मात्र प्रत्येक पक्षाची जिथे जितकी खरी ताकद असेल त्याप्रमाणे योग्य वाटप होईल. कोणावर अन्याय होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली

0

पुण्यात एका तरुणाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कात्रज परिसरात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली. मयत तरुण पान खाण्यासाठी पानटपरीवर गेला होता. तिथेच वाद झाला आणि एकाने थेट कोयताच त्याच्या डोक्यात मारला. कात्रज भागातील साई सिद्धी चौकात असलेल्या एका पानटपरीजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी एका अटक केली आहे.

कोयत्याने हत्या करण्यापूर्वी काय घडलं?

ज्याची हत्या करण्यात आली, त्या तरुणाचे नाव आर्यन साळवे आहे. आर्यन हा मूळचा नाशिकमधील आहे.

आर्यन साळवे हा त्याच्या मामाकडे धनकवडीमधील आंबेगाव पठार येथे राहण्यासाठी आलेला होता. शुक्रवारी (११ जुलै) रात्री तो साई सिद्धी चौकात गेला होता.

चौकातील एका पानटपरीवर तो पान खाण्यासाठी गेला. त्याच वेळी आर्यनचा धैर्यशील मोरे यांच्याशी वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोरेने थेट कोयताच काढला.

आर्यनची बोटं तुटली, नंतर डोक्यात केला वार

धैर्यशील मोरेने रागात कोयत्याने आर्यन साळवेवर सपासप वार केले. कोयत्याचा वार आर्यनने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा वार हातावर झाला आणि त्याची बोटं तुटली. त्यानंतर मोरेने कोयता त्याच्या डोक्यात मारला. त्यात आर्यन गंभीर जखमी झाला.

कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला नंतर आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धैर्यशील मोरेला पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात एवढा दिवस पाऊस घेणार ब्रेक; पुन्हा या दिवशीच कोसळणार पाऊस का घेणार ब्रेक? IMD चा अंदाज काय?

0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असणारा पाऊस ब्रेक घेणार आहेत. राज्यातील काही भागांत तुरळक ते मध्यम पाऊस पडणार आहे. परंतु संपूर्ण राज्यातून मोठा पाऊस ब्रेक घेणार आहे. 17 जुलैपर्यंत पाऊस सुटीवर जाणार आहे. तसेच 20 जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली आहे.

पाऊस का घेणार ब्रेक?

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 17 जुलैपर्यंत पाऊस नसणार आहे. त्यानंतर जुलैच्या तिसर्‍या आठवड्यापासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात चार दिवस ऑरेंज आणि रेल अलर्ट कुठेही दिला नाही.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

अंदामान निकोबार अन् केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. त्यानंतर राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. मे महिन्यात मान्सूपूर्व जोरदार पाऊस झाला होता. जून महिन्यात मराठवाडा, विदर्भ वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावासाने ओढ घेतला. परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पाऊस झाला. विदर्भात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील सर्व भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. आता काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या देखील झाल्या आहेत. राज्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाच्या ब्रेक कालावधीत मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. राज्यात यंदा गत वर्षीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. यंदा 2 लाख 78 हजार 345 हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरा झाला आहे. गेल्या वर्षी 1,94,827 हेक्टरवर पेरणी झाली होती.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाडांवर हल्ला, भाजपचं हे थेट कनेक्शन हल्ला करणारे काटे काय म्हणाले

0

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. यावेळी अत्यंत आक्रमक झालेल्या शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते. प्रविण गायकवाड  यांच्यावरील या हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला होता. प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सरचिटणीस असून सक्रिय पदाधिकारी आहे. तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहेत.

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. अशा खालच्या लेव्हलचे कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही. प्रविण गायकवाड यांच्याबाबत झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, आमचा संबंध नाही. दीपक काटे हा भाजपचा सरचिटणीस पदावर कार्यरत असलेला कार्यकर्ता आहे पण कारवाई झाली पाहिजे.  कोणत्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे. सुषमा अंधारेंना माहिती हवे की, कार्यकर्ते हे सगळे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात. पोलिसांनी संबंधितांवर योग्य कारवाई  करायला पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका.. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले होते.

उद्धव ठाकरे यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, पक्ष सांभाळता येत नाहीत. ठाकरेंना कार्यकर्त्यांना भेटायला वेळ नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आपला नेता अव्हेलेबल नाही तर कार्यकर्ता कोणाकडे जाणार ? भाजपमध्ये त्यांना सर्व अव्हेलेबल आहे. भाजपचे 137 आमदार आहेत. त्यामुळे हे कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर तीव्र राजकीय पडसाद

प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या हल्ल्यासाठी भाजपला जबाबदार धरत जोरदार टीका केली. ‘संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशा रितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. याच प्रवीण दादांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. हल्लेखोर सुद्धा बहुजन वर्गाचे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला तेही बहुजन वर्गाचे. त्रयस्थ यात मजा घेत आहेत. भावांनो! मला फक्त एक प्रश्न आहे, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलले होते, तो प्रशांत कोरटकर शिवयारांबद्दल बोलला होता तेव्हा हे हल्लेखोर कोणत्या बिळात लपले होते?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.

प्रविण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे काय म्हणाला?

हल्ल्याच्या घटनेनंतर दीपक काटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की,  संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असे नाव लावण्यात यावे कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय. छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते, त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही मागील दीड ते 2 वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करतोय. संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर बेताल वक्तव्य केले होते आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात, त्यामुळे हा निषेध आम्ही व्यक्त केला, असे दीपक काटे यांनी सांगितले.

पुणे शहर शिवसेनेच्या वतीने नदित दोर टाकून आंदोलन; सत्ताधारी व निष्क्रिय पुणे महापालिका प्रशासनाचा निषेध

0

हडपसर व वडगाव शेरी मतदार संघाला जोडणारा रस्ता म्हणजे केशवनगर – खराडी भागाला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे काम मागील आठ वर्षापासून अतिशय संथ गतीने चालू आहे. आणि मागील पाच महिन्यांपासून बंद आहे. सत्ताधारी व निष्क्रिय पुणे महापालिका प्रशासन कोणतेही ठोस उत्तर देत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या विरोधात सदर अर्धवट बांधलेल्या पुलावर उभे राहून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुलावरून दोर टाकून तानाजी मालुसरे प्रमाणे नदित उतरून पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलीसांनी त्यापासून रोखले.

सत्ताधारी व प्रशासनाचा तीव्र निषेध करून आंदोलन करण्यात आले. हा पूल पूर्ण झाला आणि खराडी भाग केशवनगरला जोडला गेला तर खराडीतील बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांना भाव मिळणार नाही. कारण सत्ताधारी आमदार, मंत्री यांचे आर्थिक हितसंबंध यांच्याशी जोडले गेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील व परराज्यातील पूल विक्रमी वेळेत पूर्ण होतात. सत्ताधारी स्वतःची पिठ थोपटून घेतात. मग हा पूल का पूर्ण होत नाही. हे अपयश सत्ताधारी का स्वीकारत नाही. कोणाकोणाचे हितसंबंध यामधे गुंतले आहेत ? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे ? हे पुणे मनपाचा कर भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला समजलेच पाहिजे. पुलाचे काम त्वरीत सुरू झाले नाही तर शिवसेना पुणे मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालणार असा इशारा आंदोलन प्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.

यावेळी उपशहरप्रमुख आबा निकम, सुनिल जगताप, सुरज मोराळे, महिला संघटिका विद्या होडे, युवती शहर अधिकारी शिवानी चौधरी, विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे, बाबा कोरे, सोमनाथ गायकवाड, उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड, दिनेश निकम, अमर देशमुख, तुषार सुर्वे, आकाश दुगम, पंकज मोहिते, सुरज घुले, स्वप्नील वसवे, पुणे उप शहर प्रमुख आबासाहेब निकम , युवासेना विधानसभा अधिकारी सोनू पाटील, प्रविण हिलगे, अंकित अहिरे, विकी धोत्रे, रेवन सुळ, संतोष होडे, राहुल शेडगे, बंडू नाना बोडके, रियाज शेख, शंतनू शेटे, प्रशांत जोशी, उगल मुगले, अरुण नंदू कोद्रे, आत्माराम देशमुख, संजय कदम, सतीश महाले, राम कदम, रोहित लोणकर, आदित्य पवार, महेश जाधव, ओंकार औताडे, किरण जाधव, गौरव गायकवाड, संजय सपकाळ, अजय सपकाळ, गजानन हरने, प्रवीण रणदिवे, परीशीत सिंग, गणेश मरळ, संतोष ढोरे, देवेंद्र तमायची उपस्थित होते.

सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्वेनगर वनदेवी टेकडीवर वृक्षारोपण

0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कर्वेनगर येथील वनदेवी टेकडीवर नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ तेजलताई मयूर दुधाने त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सौ अपूर्वा स्वप्निल तांबे, प्रभाग अध्यक्ष अंजलीताई मराठे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे उपाध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडू शेठ तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम करण्याचे आदेश दादांनी दिल्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम संपन्न झाला. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा 24 जुलै 2025 रोजी कर्वेनगर येथील वनदेवी टेकडीवर देशी झाडे व फळ झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व मान्यवरांनी 24 जुलै 2025 रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता वनदेवी टेकडीवर उपस्थित राहावे असे आवाहन आनंद तांबे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांनी केले आहे.

बुद्धाने आपल्या वाणीतून पंचशील दिले तोच लोकशाहीचा पाया आहे – उत्तमराव खोब्रागडे

0

मुंबई दि. ११ (रामदास धो. गमरे) “धम्म आणि धर्म या दोन वेगवेगळ्या विचारधारा असून जीवनातील सर्वच गोष्टी या देवांमुळे घडतात या संकल्पनेतून माणसाला बांधून ठेवणारी व समाजात उच्च-नीच भेद करणारी, अंधश्रद्धा, अराजकता निर्माण करणारी विचारधारा म्हणजेच धर्म होय, तर माणसाने माणसासारखे वागणे, समाज एकसंध करणे, समाजाचा विकास करणे, माणसा माणसात भेद न मानणे, दुसऱ्याबद्दल वाईट न चिंतने, इतरांच्या जागेवर, संपत्तीवर वाईट नजर न ठेवणे, राष्ट्रप्रेम बाळगणे, राष्ट्राचे रक्षण करणे हे सर्वांगीण सर्वसामान्य सामाजिक तत्व म्हणजेच धम्म होय. बुद्धाने आपल्या वाणीतून पंचशील दिले त्यात दुःख, दुःखाचे कारण आणि ते निवारण्याचे मार्ग, राष्ट्रनिर्मिती व त्याचे संरक्षण करणे, माणूस हा केंद्रबिंदू मानून सामाजिक समता, प्रेम, मैत्री या आचरणाने ही तत्व अंगीकारून ती प्रत्यक्षात उतरवून आपला विकास करणे, आर्य अष्टांगमार्ग, चार तत्व, इतर उप आठ त्याचप्रमाणे पंचशीलाचे पालन करणारा माणूस म्हणजेच बौद्ध होय, बौद्ध ही कोणती जात, धर्म, पंथ नसून बौद्ध म्हणजेच ज्ञानी व त्यालाच पाली भाषेत ब्राम्हण म्हटले आहे म्हणून पंचशील हे लोकशाहीचा पाया आहे” असे प्रतिपादन IAS अधिकारी उत्तमराव खोब्रागडे यांनी बौद्ध धर्माचे तत्वज्ञान या विषयावर वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रथम पुष्प गुंफत असताना केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन इंदू मिलचे प्रणेते, सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे आणि संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या सुस्पष्ट, पहाडी आवाजात केले, तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी प्रास्ताविक सादर करताना सदर कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन याची मांडणी करून कार्यक्रमाची सुरवात केली.

सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी “भगवान गौतम बुद्ध हे वैज्ञानिक असून त्यांना जगातील पहिला वैज्ञानिक ही म्हणता येईल, माझ्या वाचनात असे आले आहे की शंभर वर्षानंतर माणूस हा स्वतः देवाचा निर्माता आहे असे मानेल कारण जग हे विज्ञानवादी असून इतक्या जलदगतीने पुढे जात आहे की लवकरच मोठी वैज्ञानिक क्रांती घडू शकेल, माणसाच्या डोक्यातील मेंदू तसाच शाबूत ठेवून निष्क्रिय झालेले अवयव बदलून माणसाला अजरामर करण्याचे संशोधन सुरू आहे हे प्रयोग यशस्वी झाल्यास माणूस अमर मी स्वतःच देव असून देवाचा निर्माता ही मीच आहे अशी संकल्पना पुढे येऊ शकते या वैज्ञानिक मार्गाने चालणारा एकमेव धर्म हा बौद्ध धम्म असून शंभर वर्षानंतर इतर सर्वच धर्म लोप पावतील आणि वैज्ञानिक तत्वांवर चालणारा विज्ञानवादी बौद्ध धम्मच कायमस्वरूपी टिकून राहील अशी माझी खात्री आहे, आज सनदि अधिकारी उत्तमराव खोब्रागडे यांनी बौद्ध धम्म आणि त्याची तत्व या विषयावर अत्यंत मार्मिक असे उदाहरणांसह विश्लेषण देऊन स्पष्ट केली आहेत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो” असे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमास समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष व स्वागताध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक बा. तांबे, एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमणी तांबे, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, श्रीधर साळवी, चिटणीस रवींद्र शिंदे, लवेश तांबे, यशवंत कदम, अनिरुद्ध जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव, चिटणीस अंजलीताई मोहिते, उपकार्याध्यक्षा प्रमिलाताई मर्चंडे, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, मंगेश शिवराम पवार, गोविंद तांबे, निवडणूक समितीचे मिलिंद जाधव, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, व्यवस्थापक मंडळाचे विश्वस्त, शाखांचे कार्यकर्ते, जेष्ठ-कनिष्ठ बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, उपासक, उपासिका आदी विविध क्षेत्रातील मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते, भीम अनुयायींच्या उस्फुर्त प्रतिसादात सदर कार्यक्रम संपन्न झाला सदर उपस्थितांस गटक्रमांक १चे गटप्रतिनिधी मंगेश शिवराम पवार यांनी खीरदान केल्याबद्दल संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले तद्नंतर दिवंगत बौद्धाचार्य नारायण जाधव, निवडणूक अधिकारी गोकुळ जाधव व या महिन्याच्या कालावधीत जे जे मान्यवर कार्यकर्ते पडद्याआड गेले अश्या सर्वाना भावनिक होऊन श्रद्धांजली अर्पण करून संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.