Home Blog Page 149

“शिंदे तेव्हा मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते”, ठाकरेंनी बाण डागताच, शिंदेंनीही केला पलटवार, मी डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन केलंय!

0

विधान परिषदेमध्ये मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झाल्याचे दिसले. सभागृहात बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि त्यांची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते, असे म्हणत डिवचले.

एकनाथ शिंदे विधान परिषदेत बोलत होते. त्यावेळी अनिल परबांना उद्देशून त्यांनी उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितल्याचा दावा केला.

“ठाकरे मोदींना म्हणाले माफ करा”

“यांचे प्रमुख पण मोदींना जाऊन भेटले. मला माफ करा म्हणाले. आम्ही पुन्हा सोबत येतो म्हणाले. इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही (अनिल परब) पण गेले होते. तुम्हाला जेव्हा नोटीस आली, तेव्हा तुम्ही गेले होते. तुम्ही म्हणाले मला यातून सोडवा. नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. ही गोष्ट मला माहिती आहे”, असा एकनाथ शिंदे दावा उपमुख्यमंत्री शिंदेंनी विधान परिषदेत बोलताना केला.

मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात असतील -ठाकरे

एकनाथ शिंदेंनी केलेल्या दाव्याबद्दल माध्यमांनी ठाकरेंना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते. आम्हाला कळलंच नाही”, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं.

आता गटप्रमुखांनाही फोन करतात, मी ऑपरेशन केलंय -शिंदे

उद्धव ठाकरेंच्या या खोचक टीकेला शिंदेंनी उत्तर दिले. ते म्हणाले, “आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? त्यांच्याकडचे सगळे माणसं रोज येताहेत. आता डस्टबीन त्यांच्या घरातील रिकामी राहील. याचा विचार त्यांनी करावा. ते म्हणतात की, गेला तो गद्दार. गेला तो कचरा. त्यांनी आत्मचिंतन, आत्म परिक्षण केलं पाहिजे. पूर्वी आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना भेटत नव्हते. आता गटप्रमुखांनाही फोन करतात. सुधारणा झालेली आहे. मी डॉक्टर नसलो, तरी ऑपरेशन केलेलं आहे. माझा मुलगा डॉक्टर आहे. पण, मी ऑपरेशन केलं”, असा पलटवार शिंदेंनी ठाकरेंवर केला.

समाजकंटक स्थानिकच, सायंकाळची पूर्ण घटना वेगळी सकाळच्या आंदोलनाशी कुठलीही लिंक नाही.; नागपूर पोलीस आयुक्तांचा दावा

0

सोमवारी रात्री महाल व हंसापुरीमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटना व दंग्यांमध्ये बाहेरील तत्व सहभागी असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता. मात्र पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी याचे खंडन केले आहे. एकूण घटनांचा क्रम लक्षात घेतला तर कायदा व सुव्यवस्था बिघविण्याचा प्रयत्न करणारे समाजकंटक स्थानिकच असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्तांनी सोशल माध्यमांच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. सोशल माध्यमांतून अनेकांनी आक्षेपार्ह व भडकावू पद्धतीचे व्हिडीओ तसेच रील्स फॉरवर्ड-शेअर केले. त्यामुळे अनेकांच्या भावना भडकल्या. ज्या पद्धतीने घटना झाल्या, त्यावरून कुणी बाहेरून आल्याचे दिसून येत नाही. अद्यापपर्यंत तसे पुरावे दिसून आले नाही. दोन्ही गटातील लोक स्थानिकच होते असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांची ओळख पटते आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. समाजकंटकांनी बाहेरून दगड वगैरे आणले नव्हते. प्रत्यक्षात घटनास्थळाजवळच उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथीलच दगड पोलिसांवर फेकण्यात आले असे त्यांनी सांगितले.

सकाळी शिवाजी पुतळा चौकात औरंगजेबाची कबर हटविण्यावरून आंदोलन झाले होते. त्यावरून एका गटाच्या लोकांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती व माझीदेखील भेट घेतली होती. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे समाधान झाले होते. सायंकाळची पूर्ण घटना वेगळी होती. सकाळच्या आंदोलनाशी त्याची कुठलीही लिंक वाटत नाही. संबंधित भागात विविध जातीधर्मांचे लोक राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी दोन गटातील तरुण आमनेसामने आले व त्यातून तणावाला सुरुवात झाली. सोशल माध्यमांमुळे त्यात तेल ओतल्या गेले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

दिवंगत संतोष देशमुखांच्या पक्क्या घराची वीट रचली, महंतांकडून भूमिपूजन; शिंदेंनी शब्द पाळला

0

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला .खंडणी अपहरण ते निर्घृण हत्या प्रकरणात संतोष देशमुखांना संपवताना आरोपींनी आनंदोत्सव साजरा केलेल्या चित्रफिती समोर आल्या आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली. 9 डिसेंबरला आपल्या कुटुंबातील करत्या पुरुषाची हत्या झाल्याचे समजताच कुटुंबीयांच्या आक्रोशाने मस्साजोग हादरले .आपल्या गावातील ग्रामस्थांचे घर पक्के असेल तेव्हाच मी स्वतः घर बांधेन असा संकल्प सरपंच संतोष देशमुख यांचा होता .मात्र शेवटची इच्छा अपूर्णच राहिल्याचे कुटुंबाकडून कळतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना दिलेला पक्क्या घराचा शब्द पाळला आहे. पुढील तीन ते चार महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील देशमुख कुटुंबाचे घर तयार होणार असल्याची माहिती शिंदे गट जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली .

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर देशमुख कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यासाठी पक्के घर देऊ असा शब्द शिवसेना शिंदे गटाने दिला होता. अखेर उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून देशमुख यांच्या घराचे भूमिपूजन पार पडले आहे. श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज ,भगवान महाराज यांच्यासह जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुळे यांच्या हस्ते संतोष देशमुख कुटुंबीयांच्या घराचे भूमिपूजन पार पडले.

संतोष देशमुख यांच्या हस्तेनंतर कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला .भावाच्या हत्येचा न्याय मागण्यासाठी धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाणे,प्रशासन यांच्याकडून वारंवार पाठपुरावा करत न्यायाची मागणी लावून धरली .संतोष देशमुख यांच्या हत्येने सारा गाव हळहळला .दरम्यान,देशमुख कुटुंबीयांना वास्तव्यासाठी पक्के घर देण्याचं वचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं . या कुटुंबाला धीर देण्यासाठी , आणि शासनाचं कर्तव्य म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांना घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं होतं .आता या घराच्या जागेचं भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुखांनी माध्यमांना दिली . देशमुख यांच्या निधनानंतर शिवसेना शिंदे गटाने देशमुख कुटुंबाला शब्द दिला होता. आणि तो शब्द आता पूर्ण करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार महिन्यात देशमुख कुटुंबाचे मसाजोग गावात पक्के घर असणार आहे. असेही शिंदेगटाकडून सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर न्यायालयाचा प्रशांत कोरटकरला झटका; जामीन अर्ज फेटाळला, पोलिस लवकरच मुसक्या आवळणार

0

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर फरार झालेला प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने झटका दिला आहे. आज अंतरिम जामीनावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून अटकपूर्वक जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर 25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर हा फरारी आहे. वकिलांच्या मार्फत त्याने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अंतरिम जामीन मिळवला होता. त्याची 11 मार्चला मुदत संपल्याने त्यावर सुनावणी घेण्यात आली होती. त्या सुनावणीत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने झटक देत जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

सुनावणीत सोमवारी नेमके काय झाले होते?

अंतरिम जामीनबाबत सोमवारी सुनावणी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत काहीही बोलण्याचा अधिकार प्रशांत कोरटकर याला आहे का? बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. छत्रपती संभाजीराजे यांना कोरटकर ‘ऐशी होते’ असे म्हणतो. बाजीप्रभू देशपांडे नसते, तर शिवाजी महाराज नसते, असं आरोपी कोरटकर म्हणतो, अशा आरोपींना संरक्षण द्यायचे का? त्यामुळे अंतरिम जामीन नामंजूर करावा, अशी मागणी सरकारी वकील शुक्ल यांनी केली होती.

धमकी प्रकरणातील व्हायरल कॉलमधील आवाज हा माझा नाही, असं म्हणणारा आरोपी पसार कसा काय होतो? असा युक्तीवाद ॲड असीम सरोदे यांनी केला होता. दरम्यान, कोरटकरचे वकिल सौरभ घाग यांनी ‘कोरटकर हा तपासात सहकार्य करणार असून त्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. कोरटकर याचा फोन कधीही हॅक झालेला नाही. हॅक झाला असेल तर ते पोलिसांसमोर कधीच आलेले नाही. पोलिस अधिकाऱ्यांनीही तसे न्यायालयात सांगितले होते.

इंद्रजीत सावंत यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काही अपशब्द काढले असतील, तर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद करावा. पण, ब्राम्हण समाजाबद्दल इंद्रजीत सावंत असं काय म्हणाले, ज्यामुळे कोरटकर हे संतप्त झाले, याचे कारण समोर आले पाहिजे, त्यामुळे कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तीवाद ॲड. सरोदे यांनी केला होता.

दरम्यान, प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग म्हणाले की, कोरटकर हे तपास कामी आवाजाचे नमुने देण्यास तयार असल्याचे वकिला मार्फत न्यायालयास कळवले आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि माध्यमांमुळे मला अडचणी निर्माण होऊ शकतात. तपास कामात आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही कोरटकर याने वकिलामार्फत न्यायालयात सांगितले.

दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावनीनंतर न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला होता. कोल्हापूर न्यायालयाने आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सगळ्यात मोठे धर्मसंकट एकीकडे फडणवीस अन् दुसरीकडे शेतकरी… नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्गामुळे महायुती आमदार धर्मसंकटात

0

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राजकीय आणि सामाजिक प्रश्न बनला आहे. या संपूर्ण महामार्गासाठी जमिनींचे अधिग्रहण होणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी नुकतेच मुंबईत आंदोलनही केले.परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापू या विविध जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांचा मुंबईमधील आंदोलनात सहभाग होता. यातही विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कोल्हापूरमधून जास्त आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हा महामार्ग करण्यावर ठाम आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना पाचपट मोबदला देण्याची सरकारची तयारी आहे. पण शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. अशात जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे या आमदारांसाठी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समर्थन करायचे की शेतकऱ्यांचा विचार करून विरोध करायचा हे धर्मसंकट उभे आहे.

ज्या आमदारांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जात नाही. अशा लोकप्रतिनिधींनी थेट समर्थन दिले आहे. तर ज्यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जातो, तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध पाहता आमदार आणि मंत्री बुचकळ्यात पडले आहेत. याला अगदी पालकमंत्री प्रकाश आबिटकरही अपवाद नाहीत. नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा पार पडला. यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या आडून विरोध करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांनी देखील यु-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

सुरुवातीला काहींनी शेतकऱ्यांची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका असेल, असे सांगत अप्रत्यक्षपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला होता. कारण मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यांच्या विरोधात पण जाऊन चालणार नाही, याची जाण या आमदारांना आहे. मात्र फडणवीस यांनाही दुखावण्याची मानसिकता या आमदारांची नाही. त्यामुळे महायुतीतील आमदारांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दर्शवले आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांची जी काही अडचण आहे ती सोडवू पण शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे अशी भूमिका त्यांची आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश क्षीरसागर यांनीही शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळावा घेतला आहे. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे पाठिंब्याच्या व्यासपीठावर फारसे दिसत नसले तरी त्यांचाही या महामार्गाला पाठिंबा आहे, काही दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना चारपट मोबदला देण्याची मागणी केली होती.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीला या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला. पण त्यांची सध्याची परिस्थिती तळ्यात-मळ्यात आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत असेल आणि त्यांनी समर्थन दिले तर माझी भूमिका शेतकऱ्यांच्या सोबतच राहील असं वक्तव्य करून त्यांनी यु टर्न घेतला आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची भूमिका अजून उघड नाही. पण ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध नसणार असेच सगळे गृहीत धरत आहेत.

हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी देखील सुरुवातीला विरोध केला होता. मात्र त्यांची मानसिकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न दुखावण्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समजूत काढण्यापर्यंत त्यांनी तयारी केली आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा आधी विरोध होता. अगदी आंदोलनात उतरण्याची त्यांची तयारी होती. पण आता मात्र त्यांनी पद्धतशीर मौन पाळले आहे. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची भूमिका अजूनही तळ्यात मळ्यात आहे.

सगळ्यात मोठे धर्मसंकट आहे ते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित शेतकरी या मतदारसंघातील आहेत. सध्या तरी त्यांची शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका आहे. पण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही न दुखावण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र ते सध्या तरी आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत. त्यामुळे उघड उघड बोलण्याचीही त्यांची अडचण झाली आहे.

विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद, आमदारकीचे स्वप्न भंगले आज (18 मार्च) दुपारी 12 वाजता या अर्जांची छाननी पार

0

विधान परिषदेची पाच जागांसाठी जाहीर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. सहापैकी 1 अर्ज बाद झाल्याने आता 5 जागांसाठी 5 अर्जच शिल्लक आहेत. बाद झालेल्या अर्जासोबत 10 आमदारांच्या सूचक आणि 10 आमदारांच्या अनुमोदक म्हणून सह्या नव्हत्या, तसेच नोटरीही नव्हती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा अर्ज बाद ठरवला.

महायुतीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि शिवसेनेचे आमश्या पाडवी हे आमदार विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्याजागी भाजपने आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर संजय केनेकर यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते संजय खोडके आणि शिवसेनेने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली. या पाचही जणांनी काल (17 मार्च) अंतिम दिवशी अर्ज दाखल केला.

महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांच्याकडून एकही उमेदवार देण्यात आला नाही. याशिवाय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील उमेश म्हात्रे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. आज (18 मार्च) दुपारी 12 वाजता या अर्जांची छाननी पार पडली.

त्यात म्हात्रे यांच्या अर्जावर आवश्यक 10 आमदारांच्या सूचक आणि 10 आमदारांच्या अनुमोदक म्हणून सह्या नव्हत्या. याशिवाय नोटरी नसल्याने अर्ज बाद झाला. त्यामुळे पाच जागांसाठी तीन प्रमुख पक्षांच्या पाच जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.

20 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरीही तांत्रिकदृष्ट्या 20 मार्च रोजी अधिकृत घोषणा होणार आहे. या घोषणेनंतर विधानपरिषदेत भाजपचे 22, राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 7 असे महायुतीचे तब्बल 37 आमदारांचे संख्याबळ होणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 7, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार राहणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन मोदींची माफी मागितली, एकनाथ शिंदेंचा विधानपरिषेदत गौप्यस्फोट

0

मुंबई :  मी यांचा टांगापलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं आहे. धाडस करून आम्ही शिवसेना वाचवल, तुम्हाला जनतेने धडा शिकवला आहे. सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, यांचे प्रमुख मोदींना भेटून माफी मागून आले. तुम्ही दिल्लीला जाऊन लोटांगण घालून आला, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच तुमचा इतिहास मला माहीत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते विधानपरिषदेत बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन खुर्ची मिळवली, विचारधारा सोडली. यांचे प्रमुख हे दिल्लीला गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथं जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये आम्ही सामील होऊ मात्र त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला.

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले मात्र मी यांना सोडलं. त्यामुळे माझ्या सोबत 60 लोक आलं, हिंदुत्वाच सरकार मी आणलं. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आलं. एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली . शेर का बच्चा हूँ मै, 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही. तुम्हाला नोटिस आल्यानंतर कुठे गेला मला माहिती आहे, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही; …..म्हणून त्यांनी घरात दंगल पेटवली, जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरा वार

0

नागपूरात दोन गटामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून जवळपास अनेकांना अटक करण्यात आली आहे. नागपूरमधील विविध भागात संचारबंदी लागू केली आहे. तर, दुसरीकडे नागपुरातील हिंसाचारावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. या हिंसाचारावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील, स्वराज्य संकल्प शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती संभाजीनगरमधील वेरुळ येथील गढीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी उसळली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना औरंगजेबाची कबर ते नागपूरमधील हिंसाचारावर भाष्य केले.

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही..नाही तर त्यांनी कबरीच्या दिवाबत्तीला पैसे आणि पोलिसांचा बंदोबस्त दिला नसता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ घेऊन यावे मी त्यांच्या सोबत आताच निघतो असेही मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मनोज जरांगे यांनृी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. मनोज जरांगे यांनी म्हटले की, शिक्षक शेतकरी विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत आणि हे जाती जाती मध्ये भांडण लावून आपले राजकारण करीत आहेत. मुख्यमंत्री सोंगाड्या आहेत त्यांच्या सोंगात आता जनतेने फसू नये असे आवाहन त्यांनी केले. जरांगे यांनी पुढे म्हटले की, राज्यात इतर ठिकाणी लोकांनी औरंगजेबाच्या कबरीला महत्व दिले नाही. म्हणून त्यांनी आपल्याच घरात दंगल पेटवली, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

‘छावा’ मुळे लोकांच्या भावना प्रज्वलित औरंगजेबाबाबत लोकांचा राग बाहेर..’, नागपूर हिंसाचार निवदेन करताना फडणवीसांचा मोठा दावा

0

औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्यातच काल (17 मार्च) रात्री दोन गटात अचानक राडा झाला आणि नागपूरमध्ये हिंसाचार भडकला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात भडकलेल्या या हिंसाचारामुळे विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावरून सरकारला घेरलं आहे. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज (18 मार्च) विधानसभेत नागपूर हिंसाचारावर सविस्तर निवदेन दिलं. पण याच निवदेनात फडणवीसांनी थेट ‘छावा’ सिनेमाचा उल्लेख केला. ‘छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे लोकांमध्ये औरंगजेबाबद्दल जो राग आहे तो बाहेर पडत आहे.’ असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत बोलताना केलं.

‘छावा सिनेमामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाला…’

 विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘खरं म्हणजे, आज महाराष्ट्रात विशेषत: म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाही. खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही मोठ्या प्रमाणात बाहेर येतो आहे.’

‘या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी सयंम राखला पाहिजे. यासोबत मी ही देखील चेतावणी देतो की, कोणीही याठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात-धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांवर कोणी केला तर त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नागपुर हिंसाचार का भडकला? फडणवीसांचं निवेदन जसंच्या तसं…

काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली. यानंतर गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114 – 2025 नुसार भारतीय न्यायसंहिता 299, 37 (1) (3) सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी हा गुन्हा दाखल केला.

यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की, सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. दरम्यान, नमाज आटोपून 200 ते 250 जणांचा जमाव त्याठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.

यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये आमंत्रित करण्यात आलं, त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्याच्ंया तोंडावर फडके बांधले होते.

या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे. काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.

तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7.30 वाजता झाली. 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता. तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे अश्रूधूर आणि पोलीस बळाचा वापर करावा लागला. या घटनेत दोन जेसीबी आणि काही चारचाकी वाहने ही जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातील एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे.

एकूण 5 नागरिक जखमी झाले आहेत. तिघांना उपचार करून सोडलं आहे आणि दोन रुग्णालयात आहे आणि त्यापैकी 1 जण आयसीयूमध्ये आहे.

एकूण 3 गुन्हे गणेश पेठ पोलिसात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे आहेत. अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉईंटवर नाकबंदी करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्याचा पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.

एकूणच यामध्ये आपण पाहिलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती. पण त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येत आहे. याचं कारण म्हणजे एक ट्रॉलीभरून दगड मिळाले आहेत. काही लोकांनी वर जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात होते. ती शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

ठरवून काही घरांना, काही आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. डीसीपी दर्जाचे लोकं जखमी झाले आहेत. यामुळे निश्चितपणे यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतोय.

कुठल्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे.

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आपली जबाबदारी आहे. नागपुरातील किंवा महाराष्ट्रातील जनता असेल.. या सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की, सर्व समाजाचे धार्मिक सण या कालावधीमध्ये चालले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीत सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. असं अपील मी यानिमित्ताने करतो.

नागपूर कुणी पेटवलं? तलवारीनं हल्ला, पोलीसांवर कुऱ्हाडीने वार 33 पोलीस 3 अधिकारी जखमी: देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात निवेदन

0

औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत, नागपूरमध्ये काल विहिंप आणि बजरंगदलने आंदोलन केलं. या आंदोलनानंतर शहरात संध्याकाळी तणाव निर्माण झाला. वाद वाढला आणि काही वेळ हिंसाचार झाला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिलं. हिंसाचाराच्या मुळाशी असलेल्या अफवांचा संदर्भ देत मुख्यमंत्री यांनी सविस्तर निवेदन दिलं.

नागपूरमध्ये काल संध्याकाळी एक अफवा पसरली आणि प्रतिकात्मक कबरीवर ठेवलेल्या पत्र्यावर धार्मिक चिन्ह असल्याचं सांगण्यात आलं. या अफवेमुळे प्रकरण तापलं आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या.

काही जणांवर तलवारीनं हल्ला…

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, घटनास्थळी 80 ते 100 लोक जमा झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात 12 दुचाकींचं नुकसान झालं.  एक क्रेन आणि दोन जेसीबीसह चारचाकी गाड्या जाळल्या. यावरून हिंसाचाराचे गांभीर्य लक्षात येते. याशिवाय काही जणांवर तलवारीनंही हल्लाही करण्यात आला.

हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले असून, त्यात 3 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच 5 नागरिकांवरही हल्ले झाले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले असं फडणवीस म्हणाले. हा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. काही घरांना, अस्थापनांना ठरवून टार्गेट करण्यात आलं असंही फडणवीस म्हणाले.

11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमाबंदी…

या संपूर्ण घटनेसंदर्भात 5 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यासोबतच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं. राज्य सरकार या प्रकरणी कठोर कारवाई करेल आणि दोषींना सोडले जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. पोलिसांनी उचललेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले आणि या हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं.