Home Blog Page 111

बारामती क्रांतिकारक ‘एआय’ संशोधन एलॉन मस्क यांची दखल; नव्या तंत्राचा देशभर प्रयोग: केंद्रीय कृषिमंत्री चौहान

0

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतातील पहिल्या आधुनिक ऊसशेतीच्या बारामतीमधील क्रांतिकारक संशोधनाला पंतप्रधानांच्या कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बारामतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग देशभर राबविण्याची ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाने या संशोधनाचे सादरीकरण बघितल्यानंतर दिली. बारामतीतील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊसशेतीच्या प्रयोगाचे सादरीकरण आज दिल्लीत कृषीमंत्री चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आले.

यावेळी ‘अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे विश्वस्त आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. मांगीलाल जाट, एडीटी बारामतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, शरद पवार यांचे स्वीय सचिव सिद्धेश्वर शिंपी, सेंटर ऑफ एक्सलन्स एआय बारामतीचे संशोधन समन्वयक डॉ. योगेश फाटके, ‘मॅप माय क्रॉप’चे संचालक स्वप्नील जाधव व राजेश शिरोळे, ‘मॅप माय क्रॉप’चे कृषितज्ज्ञ भूषण गोसावी, मायक्रोसॉप्टच्या भारतातील कृषितज्ज्ञ आणि उद्योग संचालक सपना नौहरिया, मायक्रोसॉफ्टचे सार्वजनिक क्षेत्रातील संचालक अभिषेक बोस, मायक्रोसॉफ्टचे ‘डेटा’ आणि ‘एआय’चे तांत्रिक प्रमुख अजय बारुन, मायक्रोसॉफ्टचे गव्हर्नमेंट अफेअर्स प्रमुख संदीप अरोरा बैठकीत उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहिले होते. त्यापार्श्‍वभूमीवर हे सादरीकरण करण्यात आले.

कृषिमंत्री बारामतीला भेट देणार

या सादरीकरणामुळे प्रभावित झालेले कृषिमंत्री चौहान तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रयोग बघण्याचे ठरविले आहे. ”प्रत्येक क्षेत्रात सध्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून कृषिक्षेत्रही त्यापासून दूर राहू शकत नाही. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून तो देशभर राबविण्यात येईल,” अशी ग्वाही चौहान यांनी दिली. मायक्रोसॉफ्टचे चेअरमन व सीईओ सत्य नडेला यांनी बारामतीच्या या प्रयोगाच्या शेअर केलेल्या व्हिडिओची टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी दखल घेतली असल्याचे ऐकून शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाचे अधिकारी प्रभावित झाले.

एक हजार शेतांमध्ये प्रयोग

ऊस शेतीमध्ये हवामान बदल, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली (जीआयएस), मशिन लर्निंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यभरातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही प्रणाली ऊसाच्या सहा जातींसाठी राबविण्यात आली असून, त्यामुळे उत्पादन वाढले आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ, उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट, तीस टक्के पाण्याची बचत, रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्के घट, कापणी कार्यक्षमतेत ३५ टक्क्यांपर्यंत सुधारणा, रोगाच्या निरीक्षणामुळे औषधांच्या वापरात २५ टक्के बचत होणार आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने ऊसाच्या एकरी उत्पादनात वाढ, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, मातीचे आरोग्यवर्धन, पाण्याचा अतिरिक्त वापर कमी होऊन सिंचन कार्यक्षमतेत होणारी वाढ, कीड व रोगांचे अचूक निदान असे ऊसशेतीमधील क्रांतिकारक बदल आणि लाभ अपेक्षित असल्याची माहिती कृषिमंत्री चौहान यांना देण्यात आली.

नवीन समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न सुरू ‘शरद पवार अन् अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही’, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

0

मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या. या घटनेला काही दिवस होत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. उद्धव ठाकरे यांनीही एक पाऊल पुढे येत युतीचा प्रस्ताव स्विकारला. दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होताना दिसलं. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील, असंही बोललं जातंय. याचं कारण म्हणजे मागच्या १५ दिवसांत दोन्ही नेत्यांमध्ये वाढलेल्या भेटीगाठी.

खरंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर येणं टाळत होतं. एका मंचावर एकत्र आले, तर दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र मागच्या १५ दिवसांत तीन वेळा वेगवेगळ्या कारणांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी झाल्या आहेत. ते बैठकांना हजर राहिल्याचं दिसलं आहे. या घडामोडींमुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा आता नव्याने सुरू आहे. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आता सूचक विधान केलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर आपली हरकत नाही. दोन्ही नेते जे काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित च आहोत. कौटुंबीक संबंध हे आमचे फार जुने आहेत. आमचे राजकीय मतभेद जरी झाले असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते एनडी पाटील यांचा दाखला दिला. त्या म्हणाल्या की, “एनडी पाटील आणि शरद पवारांचे टोकाचे मतभेद होते. तरीही आम्ही, आमच्या नात्यांमध्ये कधीही कटुता आणली नाही. आता दादा जर सॉफ्ट होत असतील तर त्यात गैर काय? शरद पवारांनी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा टीका केली आहे. पण हे दोन्ही नेते एकमेकांना आदरपूर्ण भेटतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सावधान! पाऊस गेला अंगाची लाहीलाही ‘हिट वेव’चं संकट उकाड्याने हैराण! मुंबईसह 12 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

0

अवकाळीचे ढग गेले पण उष्णता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुढचे तीन दिवस उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाही लाहीलाही होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा दिला आहे. राज्यभर उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, नागरिक हैराण झाले आहेत. आज (२२ एप्रिल) विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये दमट हवामानामुळे अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असून, यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात तापमान ४४ अंशांवर

राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे नोंदवले गेले असून, ते तब्बल ४४.६ अंश सेल्सिअस इतके होते. अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा येथेही तापमान ४४ अंशांवर, तर यवतमाळ आणि सोलापूरमध्ये ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. माळकापूर, गडचिरोली, शिर्डी, परभणी, गोंदिया आणि जळगाव येथेही तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले.

राज्यात उष्णतेसोबत ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता

उत्तर छत्तीसगड ते तामिळनाडूपर्यंत सक्रीय असलेल्या हवामान पट्ट्यामुळे, काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकण व मराठवाड्यात दमट हवामान, येलो अलर्ट

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये दमट हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. या जिल्ह्यांमध्ये उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या या जिल्ह्यांमध्ये हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि अंग झाकणारे हलके कपडे वापरावेत, असा सल्ला दिला आहे.

श्री रामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा जयप्रकाश नगर, किरकटवाडीत उत्साही शुभारंभ; 32 वर्षाचा पारदर्शी कारभारही मतदारांच्या पसंतीला

0

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने निवडणूक 2024-25 / 2029-30 लढवणाऱ्या श्री रामेश्वर पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ श्री रामेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात करण्यात आला. विश्वासार्ह संचालक मंडळ व पारदर्शी कारभार या तत्त्वावर गेली 32 वर्ष समान संचालक मंडळाने कारभार केल्यामुळे पुन्हा सभासदांच्या पसंतीला श्री रामेश्वर पॅनलच पडेल असा विश्वास यावेळी सर्व उमेदवारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था सभासदांच्या हितार्थ समिती यंदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले परंतु काही मंडळींनी संस्थेचे हित पाहण्यापेक्षा स्व:हिताला किंमत दिल्यामुळे सभासदांवर ही निवडणूक लादण्यात आली असली तरी सुद्धा मागील 32 वर्षाचा कार्यभार पाहता आगामी निवडणुकीमध्ये सभासदांची पहिली पसंती ही श्री रामेश्वर पॅनलच असून रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था विद्यमान अध्यक्ष,उपाध्यक्ष, पदाधिकारी, आजी-माजी संचालक, संस्थेचे हितचिंतक, भाग भांडवलदार आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री रामेश्वर पॅनेलच्या सर्वच्या सर्व नऊ उमेदवारांना चिन्ह : कपबशी शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

श्री रामेश्वर पॅनेल अधिकृत उमेदवाराचे नाव-

अनु क्रमांक १ दांगट सचिन दशरथ सर्वसाधारण

अनु क्रमांक २ दांगट विकास पंढरीनाथ सर्वसाधारण

अनु क्रमांक ४ घुले अभिजित सोपान सर्वसाधारण

अनु क्रमांक ५ घुले बाळासाहेब काळुराम सर्वसाधारण

अनु क्रमांक ७ हगवणे बाळासाहेब अर्जुनराव सर्वसाधारण

अनु क्रमांक ८ हगवणे राजेंद्र गणपत सर्वसाधारण

अनु क्रमांक १० लगड देवीदास एकनाथ सर्वसाधारण

अनु क्रमांक ११ मते विलास साधू सर्वसाधारण

अनु क्रमांक १ देवकर राजेश शंकर

(विमुक्त जाती / भटक्या जमाती /विशेष मागास प्रवर्ग)

या सर्व उमेदवारांना ‘कपबशी’ चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले तसेच श्री रामेश्वर पॅनलचे बिनविरोध निवडून आलेल्या सौ. विनादेवी विजय मते, सौ. मनीषा भगवान मोरे, श्री, विकास रामदास कोल्हे, श्री. नागेश सोपान शिंदे सभासदांचे हार्दिक अभिनंदनही करण्यात आले.

मतदान : रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत. मतदान स्थळ : गणेश मंगल कार्यालय, नांदेड फाटा, पुणे ४१

खांदा कॉलनी येथे भीमजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

0

नवी मुंबई दि. १९ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४९ संलग्न माता रमाई महिला मंडळ, तक्षशिला तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव अर्थात भीमजयंती महोत्सव तक्षशिला बुद्ध विहार, खांदा कॉलनी येथे शाखा अध्यक्ष नथुराम साखरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात प्रथम पंचशील ध्वजारोहण व ध्वजावंदन करून शांतता व संदेश रॅली काढण्यात आली तद्नंतर ही रॅली पुन्हा तक्षशिला बुद्ध विहार याठिकाणी येऊन मधाळ, सुमधुर व सुवाच्य रसाळवाणीने धार्मिक बुद्धवंदना पूजापठण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. तद्नंतर माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आयुष्यमती पुष्पा जाधव यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितीतांचे स्वागत केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या, अभिजीत जाधव यांनी लाघवी व प्रभावी भाषाशैलीत सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे मन जिंकून घेतली.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बौद्धजन पंचायत समितीचे कोषाध्यक्ष व विभाग क्र. ५६, कामोठेचे विभाग प्रतिनिधी नागसेन गमरे यांनी बाबासाहेबांच्या अथांग कार्याचा आढावा घेत शुभेच्छापर विचार व्यक्त केले त्यासोबतच प्रवचनकार, बौद्धाचार्य सुगंध कदम यांनीही बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर व त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकत प्रबोधन केले, शाखेचे माजी चिटणीस अंकुश मोहिते यांनी ही शुभेच्छापर विचार व्यक्त करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व लोकप्रिय नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनीही उपस्थिती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. शांतता, सहिष्णुतेच्या मार्गाने सदर भीम जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

सरतेशेवटी सदर जयंती सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक मेहनत घेणाऱ्या उपाध्यक्ष भगवान विठ्ठल कांबळे, उपसचिव प्रशांत शिवराम गमरे, खजिनदार जिनावस रावजी कदम, संदेश वाहक विक्रम शिवराम गमरे, माता रमाई महिला मंडळ उपाध्यक्षा स्वाती सिद्धार्थ गमरे, सचिवा स्मिता संजय कदम, उपसचिवा सीता सुनील जाधव, कोषाध्यक्षा सुवर्णा नथुराम साखरे, संदेशवाहिका अश्विनी अशोक जाधव व कार्यकर्त्यांचे आभार मानून अध्यक्ष नथुराम साखरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

तुम्ही सर्वांनी एकत्र या राजगृह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – दर्शनाताई आंबेडकर

0

मुंबई दि. १९ (रामदास धो. गमरे) “देशातील सर्व परिस्थिती पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली होत आहे व अराजकता माजली आहे, ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत तर काही ठिकाणी वैमनस्यातून निर्घृण खून होत आहेत, देशात बेरोजगारी, महागाई, सर्वसामान्य मूलभूत गरजांचा वानवा असताना धर्माच्या नावाखाली तरुणांना पदभ्रष्ट करून, तरुणांची माथी भडकवून त्यांना मानसिक गुलाम बनवला जात आहे म्हणून बौद्धजन पंचायत समिती असो, भारतीय बौद्ध महासभा असो, समता सैनिक दल, रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी असो किंवा इतर आंबेडकरी संघटना असो या सर्वांनी प्रथम एकत्र आल पाहिजे, आपण सर्व एकत्र येऊन आम्ही सर्व एकत्र आहोत ही भावना सर्वात निर्माण होणे आवश्यक आहे आम्ही सर्व एकत्र आहोत म्हणून तुम्ही सर्व एकत्र आलात तर राजगृह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, बाळासाहेबांचे हात बळकट करा” असे प्रतिपादन मा. दर्शना ताई भीमराव आंबेडकर यांनी शिवडी येथे लाडक्या बहिणीला साड्या व लाडक्या भावाला टीशर्ट वाटप करीत असताना प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असता केले.

वंचित बहूजन आघाडी वार्ड क्र. २०१, शिवडी विभाग यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वा जयंती महोत्सवानिमित्त वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव राजा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लाडक्या बहिणीला साडी वाटप आणि लाडक्या भावाला टिशर्ट वाटप असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सुनीता गायकवाड, वडाळा तालुका अध्यक्ष रोहन पवार, वार्ड अध्यक्ष मुकेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खरावतेकर, जिल्हा संघटक राजेश तांबे, माजी उपाध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तालुका सचिव निलेश पवार, तालुका महिला कार्यकारिणी, वार्ड कार्यकारिणी आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजा पवार यांनी प्रथमच आपल्या लाडक्या बहिणींना साडी व लाडक्या भावाला टिशर्ट वाटप हा कार्यक्रम प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती निमित्त आयोजित केला होता त्याला संपूर्ण तालुक्यातून पाठिंबा मिळाला व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या उस्फुर्त कार्यक्रमा प्रसंगी अनेकांनी आपले विचार व्यक्त करीत असताना आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि बाळासाहेबांचे हात मजबूत केले पाहिजेत असा विचार सर्वांनीच व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, सरतेशेवटी अनेक राजा पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

निष्ठित कार्यकर्त्याच्या भाषणांचा संग्रह ‘ऐकलंत का?’चे अजितदादांच्या हस्ते होणार प्रकाशन

0

साहित्य, कलारसिक व्यक्तिमत्त्व, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या नर्मविनोदी भाषणांचे संकलन लिखित ““ ऐकलंत का? “” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार २५ एप्रिल २०२५, सकाळी ११ वा. स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहे.

तळागाळातील कार्यकर्ता घडत असताना कोणत्या आव्हानांना सामोरे जातो आणि व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत असताना वाचन किती आवश्यक असतं याची जाणीव संबंधित व्यक्तिमत्व व्याख्याने देताना होत असते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि फक्त आपल्या संघटन कौशल्य व नर्म-विनोदी व्यक्तिमत्त्वाच्या जीवावर व्यासंग कसा वाढतो याची जाणीव या पुस्तकातून मिळणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. ना. बाबासाहेब पाटील सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे मा. ना. दत्तात्रय मामा भरणे क्रीडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रित केले आहे.

प्रमुख उपस्थितीत मा. आ. दिलीपराव वळसे-पाटील मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा मा. रामदास फुटाणे जेष्ठ कवी वात्रटिकाकार, मा. आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर, मा. प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहभागी होणार आहेत.

श्री रामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा नांदेड गावात उत्साहात शुभारंभ; विश्वासहार्य पारदर्शी कारभारामुळे पुन्हा ‘विजयी’चा संकल्प

0

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने निवडणूक 2024-25 / 2029-30 लढवणाऱ्या श्री रामेश्वर पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ नांदेड गावांमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आला. विश्वासार्ह संचालक मंडळ व पारदर्शी कारभार या तत्त्वावर गेली पाच वर्ष समान संचालक मंडळाने कारभार केल्यामुळे पुन्हा सभासदांच्या पसंतीला श्री रामेश्वर पॅनलच पडेल असा विश्वास यावेळी सर्व उमेदवारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था सभासदांच्या हितार्थ समिती यंदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले परंतु काही मंडळींनी संस्थेचे हित पाहण्यापेक्षा प्रतिष्ठेला किंमत दिल्यामुळे सभासदांवरती ही निवडणूक करण्यात आली असली तरी सुद्धा मागील पाच वर्षाचा कार्यभार पाहता आगामी निवडणुकीमध्ये सभासदांची पहिली पसंती ही श्री रामेश्वर पॅनलच असून रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आजी-माजी संचालक संस्थेचे हितचिंतक भांडवलदार आणि मतदार उपस्थित होते. श्री रामेश्वर पॅनेलच्या सर्वच्या सर्व नऊ उमेदवारांना चिन्ह : कपबशी शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

श्री रामेश्वर पॅनेल अधिकृत उमेदवाराचे नाव-

अनु क्रमांक १ दांगट सचिन दशरथ सर्वसाधारण

अनु क्रमांक २ दांगट विकास पंढरीनाथ सर्वसाधारण

अनु क्रमांक ४ घुले अभिजित सोपान सर्वसाधारण

अनु क्रमांक ५ घुले बाळासाहेब काळुराम सर्वसाधारण

अनु क्रमांक ७ हगवणे बाळासाहेब अर्जुनराव सर्वसाधारण

अनु क्रमांक ८ हगवणे राजेंद्र गणपत सर्वसाधारण

अनु क्रमांक १० लगड देवीदास एकनाथ सर्वसाधारण

अनु क्रमांक ११ मते विलास साधू सर्वसाधारण
अनु क्रमांक १ देवकर राजेश शंकर

(विमुक्त जाती / भटक्या जमाती /विशेष मागास प्रवर्ग)

या सर्व उमेदवारांना ‘कपबशी’ चिन्हावर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले तसेच श्री रामेश्वर पॅनलचे बिनविरोध निवडून आलेल्या सौ. विनादेवी विजय मते, सौ. मनीषा भगवान मोरे, श्री, विकास रामदास कोल्हे, श्री. नागेश सोपान शिंदे सभासदांचे हार्दिक अभिनंदनही करण्यात आले.
मतदान : रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत. मतदान स्थळ : गणेश मंगल कार्यालय, नांदेड फाटा, पुणे – ४१

नांदेडगाव ऐतिहासिक ग्रामदैवत वडजाई मातेच्या साक्षीत समस्त ग्रामस्थांचा श्री रामेश्वर पॅनलला जाहीर पाठिंबा

0

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेच्या सन 20-25 ते 20 -30 या पंचवार्षिक संचालकपदाच्या निवडणूकीच्या प्रचार दौऱ्यात आज नांदेड गावातील ग्रामदैवत वडजाई मातेच्या मंदिरात प्रचार बैठक घेण्यात आली. 32 वर्षांपूर्वी 27000 रुपये भाग भांडवलावरून सुरू झालेली संस्था आज जवळपास 65 कोटी पर्यंत पोहोचविण्यात श्री रामेश्वर पॅनलच्या सर्व ज्येष्ठ संचालक, आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांचा मोठा वाटा असल्याचे अनेक मान्यवरांनी बोलून दाखवले. रामेश्वर पतसंस्था ही स्थापनेपासून विद्यमान संचालकांचे चेहरे पाहून इतकी मोठी झाली असून सर्व भाग भांडवलदारांच्या विश्वासावर श्री रामेश्वर पॅनलच्या सर्व संचालकांनी निर्धास्त राहण्याचे आश्वासन नांदेड ग्रामस्थांनी दिले.

नांदेड हद्दीतील पतसंस्था ही आमच्या घरची पतसंस्था असुन सर्व सभासद हे सधन असून समाजातील अनेक मान्यवर संस्थांवर काम करीत असल्याने येणारे काळात ही पतसंस्था 100 कोटींचा टप्पा गाठेल अशी आशा व्यक्त करीत श्री रामेश्वर पॅनलचे सर्व संचालक हे पतसंस्था सांभाळण्यास सक्षम असून ते सचालक समाजसेवा करण्यासाठी या संस्थेत असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आणि सर्व नांदेड ग्रामस्थांनी आपला जाहीर पाठिंबा श्री रामेश्वर पॅनलला देऊन सर्व उमेदवारांना विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प ग्रामदैवत वडजाई मातेच्या साक्षीने घेतला. 10000 पासून ते 50 लाख रुपयांची कर्ज रामेश्वर पतसंस्था देण्यास कशी मदत करते, विनासायास कर्ज वितरण कसे होते, सर्व संचालकांचे सौदार्यपूर्ण वागणूक आदी अनेक विषयावर कर्जदारांनी बँकेच्या संचालकांवर स्तुतीसुमने उधळली.

प्रचाराच्या या बैठकीस नांदेड गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, विविध पक्षाचे, सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कपबशी या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांच्या वतीने करण्यात आले.

राजगड कादवे गाव तळमाळावर पाणावठा निर्मिर्ती: वन्यजीवांची तहान भागणार स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा उपक्रम

0

इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देवून नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने आपले वेगळेपण जपले आहे. ऐतिहासिक वास्तू,पाणी संवर्धन,वीरगळ संवर्धन, पर्यावरण संवर्धन ,विहिरीचे पुनरजजिविकरण,  प्राचीन अवशेष असलेल्या जागेची साफ करून आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. नुकतेच प्रतिष्ठान मधील तरुणाने राजगड तालुक्यातील कादवे गावाच्या तळमाळावर पक्षी प्राण्यांसाठी मानवनिर्मित पानवठयाची सोय करण्यात आली. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वनातील नैसर्गिक जलस्त्रोत लवकर आटल्याने डोंगरादार्‍यातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे वन्यजीव पाण्याच्या शोधात वाड्या वस्तीलगतच्या असलेल्या शेतात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत

उष्णता एवढी वाढली आहे की झाडावर बसलेले पक्षी बेशुद्ध पडू लागलेत. माणसाने भर गर्मीत जर थंड पाणी पिले किंवा थंड पाण्याने हातपाय धुतले तर शरीरातील छोट्या छोट्या रक्ताच्या शिरा फाटन्यासारख्या घटना घडू लागल्यात. अशा उष्णतेत पशू पक्षी आपला घसा ओला करण्यासाठी धडपडताना दिसताहेत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनपरीक्षेत्र राजगड (उप वनविभाग भोर ) हद्दीत कादवे गावाच्या जंगलात जागोजागी करण्यात आली आहे व मुक्या जीवांची तृष्णा भागवली जात आहे तेच क्षण. मित्रांनो एक मनुष्य धर्म म्हणून आपणही आपल्या शेतात किंवा अंगणात पशूपक्षांना पाणी ठेवायला विसरू नका.ह्यासाठी पर्यावरण संवर्धनातुन पाणवठा निर्मिती मोहीम राबविण्यात आली होती.यामध्ये प्रतिष्ठान चे 7 सदस्यांनी सहभाग घेतला होता.

प्रतिष्ठान चे राजगड तालुका प्रमुख अक्षय जागडे म्हणाले, गेले अनेक वर्षांपासून हे काम करत आहोत . पाण्याच्या शोधात प्राणी गावाकडे येत आहे त्यामुळे शिकारीचे प्रमाण वाढत आहे.ह्यासाठी उपाय म्हणुन रानातच असे पाणवठे तयार करून त्यांची तहान भागवली जाते.गावापासून दूर जंगलात 25 ते 30 लिटर पाणी डोक्यावर घेउन जाऊन असे पाणवठे तयार केले आहेत.वन्यजीव वाचवा पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश सदैव देत राहणार. पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी सहकार्य करून आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी माहितीचा हात पुढे करावा असे आव्हान अक्षय जागडे यांनी केले.

या मोहिमेत आर्यन जागडे, ओम जागडे, साहिल केमुस्कर, साहिल जागडे, संस्कार शिंदे, विनोद मराठे उपस्थित होते. या मोहिमेचे नियोजन अक्षय जागडे यांनी केले.