Home Blog Page 104

श्री रामेश्वर पॅनेलच्या 90% मतदार भेटी पूर्ण; 32 वर्षाचा विश्वासहार्य पारदर्शी कारभाराच ‘विजयी’चा दृढविश्वास!

0

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने निवडणूक 2024-25 / 2029-30 लढवणाऱ्या श्री रामेश्वर पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ ते समारोप असा भरगच्च कार्यक्रम उत्साही प्रतिसादात पूर्ण झाला त्यातच व्यक्तिगत गाठीभेटीमुळे पतसंस्थेच्या सुमारे 90% मतदारांच्या गाठीभेटी पूर्ण झाल्या असून 32 वर्षाच्या पारदर्शी विश्वासहार्य कारभारामुळे झालेले उत्साही स्वागत पुन्हा सभासदांच्या पसंतीस उतरून पुन्हा विजयी करेल असा दृढ विश्वास संचालक मंडळ व  सर्व उमेदवारांना वाटत आहे. मतदान हे लोकशाहीचे पवित्र कार्य असून सर्व मतदारांनी उद्या आवश्यक मतदान करावे असे आवाहनही समारोपाच्या वेळी करण्यात आले.

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था परिसरातील एक प्रतिष्ठित आणि दैदिप्यमान संस्था आहे. संस्थेने विश्वासार्ह कारभार आणि निस्वार्थी संचालकांच्या सहकार्याने आजपर्यंत मोठी वाटचाल पार पाडली आहे. सभासदांच्या हितार्थ यंदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले परंतु काही मंडळींनी स्व:हिताला किंमत दिल्यामुळे सभासदांवर ही निवडणूक लादण्यात आल्याची जाणीव सर्व सभासदांना असल्याने मागील 32 वर्षाच्या कार्यभार पाहून आगामी निवडणुकीमध्ये सभासदांची पहिली पसंती ठरली असून रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होऊन सहकाराला कीड लावणाऱ्या लोकांचा पक्का बंदोबस्त होईल असा विश्वासही संचालक मंडळांना वाटत आहे. श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था विद्यमान अध्यक्ष,उपाध्यक्ष, पदाधिकारी,आजी-माजी संचालक, संस्थेचे हितचिंतक, भाग भांडवलदार आणि मतदार मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते.

श्री रामेश्वर पॅनेल तर्फे –

अनु क्रमांक १      दांगट सचिन दशरथ        सर्वसाधारण

अनु क्रमांक २    दांगट विकास पंढरीनाथ       सर्वसाधारण

अनु क्रमांक ४     घुले अभिजित सोपान       सर्वसाधारण

अनु क्रमांक ५    घुले बाळासाहेब काळुराम     सर्वसाधारण

अनु क्रमांक ७   हगवणे बाळासाहेब अर्जुनराव सर्वसाधारण

अनु क्रमांक ८    हगवणे राजेंद्र गणपत        सर्वसाधारण

अनु क्रमांक १०  लगड देवीदास एकनाथ    सर्वसाधारण

अनु क्रमांक ११    मते विलास साधू            सर्वसाधारण

अनु क्रमांक १     देवकर राजेश शंकर

(विमुक्त जाती / भटक्या जमाती /विशेष मागास प्रवर्ग)

या सर्व उमेदवार नशीब आजमावत असून भरघोस मतांनी विश्वासही प्रचाराच्या दरम्यान जाणवला असल्याचे उमेदवारांनी सांगितले. श्री रामेश्वर पॅनल तर्फे बिनविरोध निवडून आलेल्या सौ. विनादेवी विजय मते, सौ. मनीषा भगवान मोरे, श्री, विकास रामदास कोल्हे, श्री. नागेश सोपान शिंदे  यांनीही व्यक्तिगत गाठीभेटी घेत अन्य उमेदवारांसाठी प्रचाराची धुरा अत्यंत धडाडीने सांभाळल्याने रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत गणेश मंगल कार्यालय, नांदेड फाटा, पुणे – ४१ येथे उत्साही मतदान पार पडण्याची आशा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

‘वेळ आली आहे एकत्र येण्याची’ शिवसेनेच्या पोस्टचा नेमका अर्थ काय? सर्वांच्या नजरा खिळल्या….

0

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होणारी एकमेव मागणी आणि मतदारांच्या मनातली गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली दरी मिटणं.अर्थात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र यावं असा सूर आजवर अनेकांनीच आळवला, अधूनमधून तसे संकेतही मिळाले. पण, प्रत्यक्षात मात्र या चर्चा हवेतच विरून गेल्या.

आता मात्र या चर्चांना अनुसरूनच एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आल्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना UBTच्या अधिकृत पेजवरुन करण्यात आलेल्या एका पोस्टमुळं या सर्वांच्या नजरा इथं खिळल्या आहेत.

“वेळ आली आहे एकत्र येण्याची,

मुंबई आणि महाराष्ट्रासाठी

शिवसैनिक तयार आहे,

मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी” अशा आशयाची पोस्ट शिवसेना UBTच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंनी दिलेले एकत्रीकरणाचे संकेत लवकरच प्रत्यक्षात उतरतील का ? आणि गेल्या अनेक वर्षांपासून असलेली प्रतीक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने पूर्ण होईल का? हाच सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

वरील शब्द आणि जनमानसाच्या गर्दीतून सर्वांचं अभिवादन स्वीकारणारे उद्धव ठाकरे या पोस्टमध्ये दिसत असून, आता हे शब्द नेमके काय सुचवू पाहत आहेत, याचाच तर्कवितर्क सध्या लावला जात आहे.उद्धव ठाकरेंसह एकत्र येणं शक्य? राज ठाकरेंचं मत काय?

एकिकडे या चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलेल्या राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा संदर्भही दिला जात आहे. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही, असं ते म्हणाले होते. “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही”, असं स्पष्ट मत मांडत त्यांनी नात्याची ही बाजू सर्वांसमोर ठेवली होती.

दहावी बारावी बोर्डाला निकालाची जय्यत तयारी तारीख जाहीर, बोर्डाकडून मोठी अपडेट

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या वर्षी निकाल २० मे नंतर लागला होता. पण यंदा बारावीचा निकाल १० मेच्या आधी लागेल, तर दहावीचा निकाल १५ मेच्या आधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षेतील तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये उपलब्ध केला जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. बोर्डाकडून यंदा निकालाची डेडलाईन पाळण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झालेय. त्यामुळे वेळेत निकाल लागू शकतो.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल यंदा वेळेआधी जाहीर करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. निकाल लवकर लागण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा १० ते १५ दिवस लवकर घेण्यात आल्या आहेत. दरवर्षीपेक्षा आधीच परीक्षा घेण्यात आल्या आहेत, त्यामुळे निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागू शकतो.

सर्वांच्या सहकार्याने दहावी-बारावीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. किरकोळ घटना वगळता यंदा कॉपी करण्याच्या घटना कमी झाल्या. पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केलेय. त्यामुळे राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

यावर्षी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला नाही. त्यामुळे पेपर तपासणी वेळेत पूर्ण झाली. त्यामुळे बोर्डाला निकालाची जय्यत तयारी करता आली. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे ८७ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. यापैकी ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे आयडी मंडळाकडे उपलब्ध आहेत. डिजिलॉकरवरील निकाल कायमस्वरूपी उपलब्ध राहणार असून, भविष्यात विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. गोसावी यांनी प्रशासन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे परीक्षा यशस्वी झाल्याचे सांगितले.

शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

पुणे शहरात मुख्य ६१ रस्ते खोदणार ‘वाहतूक’ची परवानगी पण या तारखेपर्यंत काम पूर्ण करा महापालिकेला तंबीच!

0

पुण्यात सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरातील जवळपास ६१ रस्त्यांवर खोदकाम केलं जाणार आहे. आधीच वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करणाऱ्या पुणेकरांना आणखी मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करावं अशी तंबीच महापालिकेला दिली असल्याची माहिती समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महापालिकेच्या मलनिःसरण विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी रास्त खोदण्यास वाहतुक पोलिसांनी पुणे महापालिकेला परवानगी दिलीय. वाहतूक पोलिसांनी महापालिकेला कामाची परवानगी दिली असली तरी ही सर्व कामं ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करा असेही आदेश दिलेत. जर ३१ मे पर्यंत काम पूर्ण झालं नाही तर संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलीय.

पुण्यातील कोथरूड, वारजे, येरवडा, बाणेर, हडपसर, बालेवाडी, बीटी कवडे रोड, कोंढवा, बिबवेवाडी, धानोरी, शिवाजीनगर, सारसबाग या परिसरातील रस्त्यांवर खोदकाम केलं जाणार आहे. यामुळे या भागात वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही प्रकल्पाच्या या कामाचं वेळापत्रक मागवलं आहे. कोणत्या भागात कधी आणि किती काळ काम चालणार आहे याची माहिती यामध्ये असेल. नियोनानुसार वेळेत काम पूर्ण व्हावं यासाठी प्रशासनाकडूनही लक्ष ठेवलं जाणार आहे.

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाचा नवा आदेश; कुत्रा, मांजरा वरही स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

0

पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांवरही यापुढे अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. याबाबत नगर विकास विभागाकडून आदेश जारी करण्यात आलाय. तसंच प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुठेही फेकून दिले जातात. त्यामुळे दुर्गंधी सुटते आणि रोगराई पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून आदेश जारी करण्यात आला आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांबाबत आणि अंत्यसंस्काराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पाळीव प्राण्याचे मृतदेह खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याची डबकी, रस्त्यावर फेकले जातात. त्यामुळे अनेकदा परिसरात दुर्गंधी पसरते. रोगराईचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

मृत्यू झालेल्या पाळीव प्राण्यांचे अंत्यविधी करताना दुर्गंधी येणार नाही. रोगराई पसरणार नाही याची काळजी घ्यावी. पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह इतरत्र टाकले जाणार नाहीत याबाबत दक्षता नागरी स्वराज्य संस्थांनी घ्यावी. पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कारासाठी ठराविक शुल्क आकारून अंत्यविधीची परवानगी द्यावी असंही राज्य सरकारने आदेशात म्हटलं आहे.

चीनने रंग दाखवले, पाकिस्तानच्या बाजूने उतरला मैदानात, हे घातक मिसाइल भारतावर चालवण्यासाठी दिलं

0

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये मोठा तणाव आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खवळलेला भारत कसा बदला घेणार? हीच भिती पाकिस्तानला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला अखेर चीन धावून आला आहे. चीनने सवयीप्रमाणे आपले खरे रंग दाखवले आहेत. चीनने पाकिस्तानला 100 पेक्षा जास्त PL-15 लॉन्ग रेंज एअर टू एअर हल्ला करु शकणारी (VLRAAM) मिसाइल्स दिली आहेत. हा तणाव कुठल्याही क्षणी मोठ्या युद्धात बदलू शकतो, हा त्यामागचा संदेश आहे. या मिसाइल्सची रेंज 200 किलोमीटर असल्याच सांगितलं जातं. PL-12 पेक्षा ही रेंज अधिक आहे. JF-17 मधून PL-12 ची 100 किलोमीटर रेंज आहे.

पाकिस्तानी एअरफोर्सने PL-15 एयर-टू-एयर मिसाइल (VLRAAM) JF-17 थंडर ब्लॉक-3 मध्ये फिट केलं आहे. विंग टिप्सवर PL-10E WVRM HOBS सक्षम मिसाइल दिसतेय. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री आणि चिनी डिप्लोमॅट्सची बैठक झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभार सुद्धा मानले आहेत.

तणावाने टोक गाठलेलं असताना पाकिस्तानला मदत

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली की, चिनी राजदूत जियांग जैदोंग यांनी उपपंतप्रधान/परराष्ट्र मंत्री सीनेटर मोहम्मद इशाक डार यांच्याशी चर्चा केली. दोघांनी सधाच्या परिस्थितीवर चर्चा केली. अलीकडच्या काही वर्षात पाकिस्तान आणि चीनमध्ये रणनितीक भागिदारी अधिक दृढ झाली आहे. तणावाने टोक गाठलेलं असताना चीनने पाकिस्तानला ही मदत केली आहे.

पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार वापरला

भारताविरुद्ध लढाई एकट्या पाकिस्तानला पेलवणारी नाही. त्यामुळे ते नेहमीच चीनकडे हात पसरतात. आता सुद्धा त्यांनी तेच केलय. चीनने शस्त्रास्त्र देण्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे. चीनकडे संयुक्त राष्ट्रात वीटो पावर आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार सुद्धा वापरला आहे.

‘फुले: एक क्रांतिकारी वारशा’ला न्याय देण्याची संधी गमावली; हेतूता कमी उंची करण्यासाठी निर्मिती का? मृणाल ढोले पाटील यांचा गंभीर आरोप

0

फुले, दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला आणि २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कथेला मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. हे भारतातील अग्रगण्य सामाजिक सुधारक होते, ज्यांनी जातीच्या दडपशाहीला आव्हान दिले आणि महिला व वंचित समुदायांसाठी शिक्षणाला प्रोत्साहन दिले. प्रतीक गांधी ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत आणि पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत असलेला हा चित्रपट भारतीय इतिहासातील कमी ज्ञात पण महत्त्वपूर्ण अध्यायावर प्रकाश टाकण्याचे वचन देतो. परंतु, त्याच्या उदात्त हेतूंनंतरही, फुले अपेक्षांना पूर्ण करत नाही, एक निराशाजनक चित्रण सादर करतो जे त्याच्या मुख्य पात्रांना किंवा त्यांच्या क्रांतिकारी योगदानाला न्याय देत नाही. संथ पटकथा, चुकीच्या ऐतिहासिक संदर्भांसह, कमकुवत कथानक आणि सेन्सॉर बोर्डाच्या हस्तक्षेपामुळे झालेल्या लक्षणीय बदलांमुळे, हा चित्रपट निराशाजनकपणे पाचपैकी फक्त दोन तारे मिळवतो.

क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाचे दडपलेले चित्रण

फुले मधील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे ज्योतिराव फुले, भारताच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महान व्यक्तिमत्त्व, यांचे आश्चर्यकारकपणे दडपलेले आणि दीन चित्रण, जे त्यांच्या सामाजिक क्रांतिकारी म्हणून वारशाशी पूर्णपणे विसंगत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, फुले हे एक धाडसी, तडजोड न करणारे कार्यकर्ते होते ज्यांनी ब्राह्मणी रूढी आणि जातीच्या भेदभावाविरुद्ध निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना आणि शूद्र व दलितांच्या हक्कांसाठी त्यांचा अथक प्रयत्न यामुळे त्यांचे दृढ निश्चयी आणि साहसी व्यक्तिमत्त्व दिसून येते. अशा क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाला त्याच्या जीवनातील उत्साह आणि बंडखोरीसह दाखवले पाहिजे, दडपशाहीचा बळी म्हणून नव्हे. परंतु, चित्रपटात प्रतीक गांधी यांनी साकारलेले ज्योतिराव अति संयमित स्वभावाचे दाखवले गेते, ज्यामुळे सुधारकाच्या जीवनातील तीव्र इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो. गांधी, त्यांच्या सूक्ष्म अभिनयासाठी ओळखले जाणारे, एक शांत आणि प्रामाणिक चित्रण देतात, परंतु पटकथा त्यांना एक सपाट आणि क्रांतिकारी उत्साहापासून वंचित असा व्यक्तिरेखा देतात. त्यांचा अंतर्मुखी अभिनय, सूक्ष्म असला तरी, सामाजिक रूढींना थेट आव्हान देणाऱ्या व्यक्तीच्या गतिमानतेचे चित्रण करण्यात अपयशी ठरतो.

या चुकीच्या चित्रणाला आणखी तीव्र करणाऱ्या काही अनैतिहासिक आणि अनावश्यक प्रसंगांमध्ये महात्मा फुले यांना उच्चवर्णीय विरोधकांकडून मारहाण आणि अपमान सहन करताना दाखवले आहे. हे प्रसंग, ज्यांना ऐतिहासिक आधार नाही, फुले यांना शक्तिहीन व्यक्ती म्हणून दाखवतात, ज्यामुळे त्यांचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व आणखी कमकुवत होते. अशा चित्रणांना केवळ तथ्यांचा आधार नाही—फुले यांच्या जातीच्या दडपशाहीविरुद्ध बुद्धी, कृती आणि बंडखोरीने भरलेल्या दस्तऐवजीकरणामुळे—तर ते त्यांच्या कथेचा प्रेरणादायी प्रभाव कमी करतात. काल्पनिक पीडितपणाच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करून, चित्रपट फुले यांच्या बुद्धी, कृती आणि बंडखोरीद्वारे वंचितांना सक्षम करणाऱ्या सक्रिय नेत्याच्या वारशाला मान देण्यात अपयशी ठरतो, त्याऐवजी नाट्यमय कथानकाला प्राधान्य देतो जे त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वापासून अलिप्त आहे.

त्याचप्रमाणे, पत्रलेखा यांनी साकारलेली सावित्रीबाई फुले यांची भूमिका, चित्रपटातील एक उज्ज्वल बिंदू असली तरी, तिला योग्य खोली मिळत नाही. मुलींना शिक्षण देण्यासाठी आणि विधवांसाठी लढणाऱ्या सावित्रीबाई, ज्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला, यांना काही प्रसंगांमध्ये धैर्य आणि सहानुभूतीसह दाखवले आहे, विशेषत: १८९७ च्या प्लेगच्या काळातील त्यांच्या कार्याचे चित्रण करणाऱ्या दृश्यांमध्ये. तथापि, पटकथा त्यांचे ज्योतिराव यांच्याशी बौद्धिक भागीदारी किंवा कवयित्री आणि शिक्षिका म्हणून त्यांची भूमिका पूर्णपणे शोधत नाही. चित्रपट त्यांच्या भावनिक सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे त्यांच्या क्रांतिकारी योगदानावर पडदा पडतो, आणि त्यांना समान क्रांतिकारी ऐवजी सहाय्यक व्यक्ती म्हणून कमी करतो. व्यक्तिरेखांच्या विकासातील हा असमतोल फुले दाम्पत्याच्या भागीदारीला, जी त्यांच्या सुधारणा प्रयत्नांचा आधारस्तंभ होती, कमकुवत करतो.

इतर पात्रांना अवास्तव महत्त्व आणि लहुजी वस्ताद साळवे यांचे न-आकर्षक चित्रण

फुले मधील आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे मुख्य जोडप्याच्या खर्चावर परिघीय पात्रांना अवास्तव महत्त्व देणे. ज्योतिराव यांचे रूढीवादी वडील म्हणून विनय पाठक आणि उच्चवर्णीय विरोधक म्हणून जॉय सेनगुप्ता यांसारख्या सहाय्यक भूमिका फुले यांना सामाजिक आव्हानांचा संदर्भ देतात, परंतु त्यांचा स्क्रीन वेळ अनेकदा मुख्य कथानकाला झाकोळतो. उदाहरणार्थ, फुले यांच्या शाळेला विरोध करणाऱ्या ब्राह्मण विरोधकांचे विस्तृत प्रसंग पुनरावृत्ती वाटतात आणि सुधारकांच्या स्वतःच्या संघर्ष आणि यशांचा शोध घेण्यापासून विचलित करतात. त्याचप्रमाणे, फुले यांना मदत करणाऱ्या उस्मान शेख आणि फातिमा यांसारख्या पात्रांना अवास्तव महत्त्व दिले जाते, ज्यामुळे ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांच्या वैयक्तिक आणि वैचारिक प्रवासावर लक्ष केंद्रित होणे कमी होते.

विशेषत: लहुजी वस्ताद साळवे यांचे चित्रण, जे ज्योतिराव फुले यांना शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणारे आणि मातंग समुदायातील सामाजिक सुधारक आणि शिक्षक म्हणून ओळखले जाणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व, हे खूपच निराशाजनक आहे. फुले मध्ये, लहुजी यांचे पात्र त्यांच्या मजबूत शारीरिक रचना आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या ऐतिहासिक वर्णनांशी जुळत नाही, कारण निवडलेल्या अभिनेत्याचे चित्रण न-आकर्षक आहे. लहुजी, ज्यांना उंच, स्नायुयुक्त आणि योद्ध्यासारखे व्यक्तिमत्त्व म्हणून वर्णन केले जाते, ज्यांनी फुले यांच्या शारीरिक आणि मानसिक लवचिकतेला प्रेरणा दिली, त्यांना प्रभावी उपस्थिती आणि गंभीरतेच्या अभावाने दाखवले आहे. हे न-आकर्षक चित्रण त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाला कमी करते, ज्यामुळे त्यांची भूमिका फुले यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण प्रभावापेक्षा दुय्यम वाटते. लहुजी यांचे सार पकडण्यात चित्रपटाचे अपयश त्याच्या ऐतिहासिक प्रामाणिकपणाला आणखी कमकुवत करते.

दार्शील साफरी यांनी साकारलेल्या यशवंत, फुले यांचा दत्तक मुलगा, यांचा समावेश हा आणखी एक वादाचा मुद्दा आहे. ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेणे हे जातीच्या रूढींविरुद्धचे महत्त्वपूर्ण कृत्य होते, परंतु चित्रपटात यशवंत यांची भूमिका अपुरी विकसित आहे, साफरी यांचा अभिनय मर्यादित संवाद आणि स्क्रीन वेळेमुळे साधारण वाटतो. कथानकातील ही असमान वाटणी प्रेक्षकांना फुले यांच्या मुख्य ध्येयापासून आणि त्यांच्या परिवर्तनकारी प्रभावापासून अलिप्त ठेवते.

चुकीचे ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्वपूर्ण वगळलेले मुद्दे

महात्मा फुले यांचे कार्य १९व्या शतकातील भारताच्या व्यापक संदर्भात मांडण्याचा प्रयत्न करते, १८५७ च्या बंड, फ्रेंच क्रांती आणि अमेरिकेतील गुलामगिरी निर्मूलन यांसारख्या घटनांचा उल्लेख करतो. तथापि, हे संदर्भ जबरदस्तीने आणि खराबपणे समाविष्ट केलेले वाटतात, ज्यामुळे चित्रपट इतिहासाच्या पाठ्यपुस्तकासारखा वाटतो, न की एकसंध सिनेमॅटिक कथानक. ऐतिहासिक संदर्भांचा अतिरिक्त समावेश कथानकाला गोंधळात टाकतो आणि फुले यांच्या विशिष्ट योगदानापासून लक्ष विचलित करतो. उदाहरणार्थ, जागतिक घटनांचा उल्लेख असंबंधित वाटतो, कारण चित्रपट त्यांना फुले यांच्या वैचारिक विकासाशी किंवा पुण्यातील त्यांच्या स्थानिक संघर्षांशी योग्यरित्या जोडत नाही.

चित्रपटाची ऐतिहासिक अचूकता केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) १२ कट लादल्यामुळे आणखी धोक्यात येते, ज्यांनी प्रामुख्याने फुले यांच्या उच्चवर्णीय रूढींविरुद्धच्या संघर्षांचे आणि जाती-आधारित धार्मिक प्रथांवरील टीकेचे चित्रण करणाऱ्या दृश्यांना लक्ष्य केले. काही गटांच्या भावना दुखावण्यापासून टाळण्यासाठी केलेल्या या कटमुळे कथानक त्याच्या ऐतिहासिक मुळांपासून लक्षणीयरीत्या विचलित झाले आहे, ज्यामुळे फुले यांचा ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्धचा कट्टर दृष्टिकोन सौम्य झाला आहे. ज्योतिराव यांच्या रूढीवादी नेत्यांशी तीव्र वादविवाद किंवा सावित्रीबाई यांच्या सामाजिक रूढींविरुद्धच्या धाडसी बंडखोरीचे चित्रण करणारी दृश्ये एकतर सौम्य केली गेली किंवा काढून टाकली गेली, ज्यामुळे कथानक स्वच्छ आणि फुले यांच्या क्रांतिकारी आत्म्यापासून अलिप्त वाटते. या सेन्सॉरशिपने चित्रपटाला दाम्पत्याच्या निर्भय कार्यकर्तेपणाचे खरे चित्रण करण्याची संधी हिरावली आहे, प्रेक्षकांना तुटलेली आणि कमी प्रभावी कथा सोडली आहे.

यापेक्षा जास्त त्रासदायक म्हणजे चित्रपटाने ज्योतिराव फुले यांच्या वारशातील अनेक महत्त्वपूर्ण पैलूंकडे दुर्लक्ष केले आहे, त्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगाला लिहिलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष. हे पत्र, ज्याला औपचारिकपणे “शिक्षण आयोगासाठी निवेदन” म्हणून ओळखले जाते, हे औपनिवेशिक शिक्षण धोरणांवर एक क्रांतिकारी टीका आणि भारतात सर्वसमावेशक शिक्षणासाठी एक दूरदृष्टीपूर्ण आराखडा होता. सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाला सादर केलेल्या या पत्रात फुले यांनी जाती, लिंग किंवा आर्थिक स्थितीच्या पर्वा न करता सर्वांसाठी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची जोरदार मागणी केली. त्यांनी खालच्या जाती, महिला आणि ग्रामीण समुदायांना शिक्षणापासून पद्धतशीरपणे वंचित ठेवण्यावर प्रकाश टाकला, औपनिवेशिक सरकारच्या केवळ उच्चवर्णीयांना सेवा देणाऱ्या इंग्रजी-माध्यमाच्या कुलीन संस्थांवर केंद्रित धोरणांवर टीका केली. फुले यांनी स्थानिक भाषांमध्ये शिक्षण, शेती आणि व्यावसायिक कौशल्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण आणि समान पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी वंचित समुदायांमधून शिक्षकांची नियुक्ती याची वकिली केली. त्यांनी गरीब कुटुंबांना, विशेषत: मुलींना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती सारख्या प्रोत्साहनांचा प्रस्ताव मांडला आणि धार्मिक किंवा जातीच्या पक्षपातापासून मुक्त असलेल्या धर्मनिरपेक्ष शिक्षणाची गरज अधोरेखित केली.

हे पत्र केवळ धोरण शिफारस नव्हते तर एक क्रांतिकारी जाहीरनामा होता ज्याने औपनिवेशिक आणि ब्राह्मणी ज्ञानावरील मक्तेदारीला आव्हान दिले. याने फुले यांची दूरदृष्टी दाखवली की एक शिक्षण व्यवस्था जी जनसामान्यांना सक्षम करू शकेल आणि सामाजिक असमानता दूर करू शकेल—एक दृष्टिकोन जो आजच्या शिक्षण समानतेच्या चर्चेतही प्रासंगिक आहे. फुले मध्ये या पत्राचा उल्लेख न करणे ही एक गंभीर चूक आहे, कारण यामुळे ज्योतिराव यांना एक बौद्धिक दिग्गज म्हणून चित्रित करण्याची संधी हिरावली जाते ज्यांच्या कल्पनांनी आधुनिक भारताच्या शिक्षण ढाच्याला प्रभावित केले. या महत्त्वपूर्ण कार्याकडे दुर्लक्ष करून, चित्रपट फुले यांच्या वारशाला त्यांच्या शाळांवर संकुचित लक्ष केंद्रित करतो, त्यांच्या प्रणालीगत सुधारणांमधील व्यापक योगदानाचे चित्रण करण्यात अपयशी ठरतो.

इतर महत्त्वपूर्ण वगळलेले मुद्दे; ऐतिहासिक विश्वासार्हता कमकुवत

चित्रपटाने १८६९ मध्ये रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावण्याचे फुले यांचे महत्त्वपूर्ण कृत्य पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे, जे त्यांनी सामान्य लोकांचा चॅम्पियन म्हणून पूज्य असलेल्या शासकाबद्दलच्या आदराचे प्रतीक होते. फुले यांनी समाधी पुनर्जनन आणि १८७० मध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली, जी बाल गंगाधर टिळक यांनी लोकप्रिय करण्यापूर्वी होती, यामुळे मराठा अभिमान वाढवण्यात आणि ब्राह्मणी इतिहासाच्या कथनांना आव्हान देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याचा उल्लेख न करणे, चित्रपटाला फुले यांच्या ऐतिहासिक स्मृती पुनर्रचना आणि वंचित समुदायांना सक्षम करण्यातील भूमिकेचे प्रदर्शन करण्याची संधी गमवते.

याव्यतिरिक्त, चित्रपटाने बाल गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना त्यांच्या कायदेशीर अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी फुले यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण हस्तक्षेपांकडे दुर्लक्ष केले आहे. फुले यांनी वैचारिक मतभेद असतानाही या राष्ट्रीय नेत्यांना आर्थिक आणि नैतिक समर्थन दिले, ज्यामुळे त्यांचा न्याय आणि एकतेच्या व्यापक दृष्टिकोनावर जोर दिसतो. सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय चळवळींना जोडणारी ही एकता कृती चित्रपटात पूर्णपणे अनुपस्थित आहे, ज्यामुळे फुले यांच्या बहुआयामी वारशाचे चित्रण आणखी कमकुवत होते.

चित्रपटाने ज्योतिराव यांचे शेतकरी आणि ग्रामीण गरीबांसाठीचे विस्तृत कार्य देखील हायलाइट केले नाही. रयत (शेतकरी) चे चॅम्पियन म्हणून, फुले यांनी जमीनदार आणि औपनिवेशिक धोरणांद्वारे शेतकऱ्यांच्या शोषणाबद्दल विस्तृतपणे लिहिले, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी वकिली केली. त्यांचा “छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा” यामध्ये शिवाजी यांना जनसामान्यांचे नेते म्हणून चित्रित केले आहे, ज्यामध्ये शेतीच्या न्यायावर जोर देण्यात आला आहे. चित्रपटाने या पैलूकडे दुर्लक्ष करून फुले यांना केवळ शिक्षण आणि जाती सुधारणांवर केंद्रित एक आयामी व्यक्ती म्हणून कमी केले आहे, त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष केले आहे.

छायाचित्रण, संवाद आणि पटकथा: कमकुवत अंमलबजावणी

तांत्रिक दृष्टिकोनातून, फुले प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरतो. छायाचित्रण, जरी कधीकधी १९व्या शतकातील महाराष्ट्राच्या रचनांचे चित्रण करते, त्यात दृश्यात्मक चमक नाही आणि एक भारवणारे वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरते. फुले यांच्या शाळेचे किंवा १८९७ मधील प्लेगग्रस्त पुण्याचे चित्रण करणारी दृश्ये नाट्यमय वाटतात, स्थिर कॅमेरा कार्यामुळे कथानकाच्या भावनिक वजनाला वाढवता येत नाही. कालखंडातील पोशाख आणि सेट्सद्वारे प्रामाणिकपणा आणण्याचा चित्रपटाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, परंतु एकंदरीत दृश्यात्मक अंमलबजावणी प्रेरणाहीन वाटते, प्रेक्षकांना त्या युगात नेण्यात अपयशी ठरते.

संवाद, सुवक्ता सुधारकांवरील बायोपिकमधील एक महत्त्वाचा घटक, हा आणखी एक कमकुवत दुवा आहे. ज्योतिराव यांचा “देवाचे दरवाजे खालच्या जातींसाठी उघडतील का” असा मार्मिक प्रश्न विचारणारा काही ओळी भावनिक संनाद देतात, परंतु बरेच संवाद जबरदस्तीने आणि अति नाट्यमय वाटतात. ऐतिहासिक संदर्भ व्यक्त करण्यासाठी पटकथेची अवलंबिता चित्रपटाला एक आकर्षक कथा ऐवजी व्याख्यानासारखे बनवते. समीक्षकांनी नमूद केलेले हे “पुस्तकसदृश दृष्टिकोन” पाहण्याचा अनुभव कंटाळवाणा बनवते आणि फुले यांच्या कार्याच्या क्रांतिकारी आत्म्याला उजागर करण्यात अपयशी ठरते.

पटकथा, जी दोन तास आणि नऊ मिनिटांच्या संथ गतीने चालते, या समस्यांना आणखी तीव्र करते. मध्यवर्ती कृत्यामध्ये, रूढीवादी ब्राह्मणांशी पुनरावृत्तीच्या टकरावांमुळे कथानकाची गती मंदावते. चित्रपटाची रेखीय रचना, सरळ असली तरी, प्रेक्षकांचा सहभाग टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक सर्जनशील कथाकथनाचा अभाव आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी बायोपिक मी सिंधुताई सपकाळ साठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अनंत महादेवन एक संयमित, दस्तऐवजीकरण शैलीचा अवलंब करतात, परंतु हा निवड चित्रपटाला अधिक शिक्षणात्मक बनवते, रोमांचक ऐवजी. रोहन यांनी संगीतबद्ध केलेली दोन गाणी आणि बासरी-प्रधान पार्श्वसंगीत नाटकाला उंचावण्यात कमी पडते, अनेकदा चुकीचे किंवा अति भावनिक वाटते.

प्रभावित आणि प्रेरणा देण्यात अपयश

ऐतिहासिक महत्त्वानंतरही, फुले दीर्घकाळ प्रभाव टाकण्यात अपयशी ठरतो. फुले यांच्या योगदानाचा उत्सव साजरा करण्याचा चित्रपटाचा हेतू त्याच्या आकर्षक कथानक तयार करण्यात किंवा मुख्य पात्रांना पूर्णपणे विकसित करण्यात असमर्थतेमुळे कमकुवत होतो. मुख्य प्रवाहातील हिंदी बायोपिकमधील अतिशयोक्ती टाळत असताना, त्याचा अति सावध दृष्टिकोन एक नीरस, प्रेरणाहीन अनुभव बनवतो. फुले यांची कथा, जी जाती आणि लिंग दडपशाहीविरुद्ध कृतीसाठी एक प्रेरणादायी आवाहन असायला हवी होती, ती भावनिक खोली नसलेल्या तुटलेल्या भागांमध्ये कमी होते. लहुजी वस्ताद साळवे यांचे न-आकर्षक चित्रण, हंटर शिक्षण आयोगाला पत्रासारख्या महत्त्वपूर्ण योगदानांचा वगळणे आणि सेन्सॉर बोर्डाच्या कटमुळे ऐतिहासिक अचूकतेची कमतरता यामुळे चित्रपटाची विश्वासार्हता आणखी कमी होते, फुले यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि क्षणांना योग्य वजन देण्यात अपयशी ठरते.

चित्रपटाच्या आव्हानांमध्ये प्री-रिलीज वादांनी त्याच्या स्वागताला लक्षणीय अडथळा आणला. जातीच्या गतिशीलतेचे चित्रण आणि धार्मिक रूढीवादीपणावर टीका यावर काही गटांनी केलेल्या निषेधांमुळे प्रदर्शनापूर्वी ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण झाले. या वादांनी, CBFC च्या १२ कट्ससह, X सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा निर्माण केली, जिथे चित्रपटाच्या हेतूचा बचाव करणारे आणि त्याच्या तडजोडींवर टीका करणारे असे मतभेद दिसले. चित्रपट निर्मात्यांनी सार्वजनिक निवेदन आणि संपादनांद्वारे नाराज गटांना शांत करण्याचे प्रयत्न सकारात्मक चर्चा निर्माण करण्यात अपयशी ठरले, त्याऐवजी चित्रपटाच्या प्रचारात्मक प्रयत्नांवर सावट टाकली. प्री-रिलीज गतीचा अभाव, कथानकाच्या कमतरतांसह, यामुळे फुले प्रेक्षकांशी जोडले जाण्यात किंवा त्याच्या विषयाच्या आदराला प्रेरणा देण्यात अडचण आली.

समीक्षकांनी या भावनांना पाठिंबा दिला आहे, चित्रपटाला “मध्यम” आणि “कंटाळवाणा” असे वर्णन केले आहे, त्याच्या मजबूत अभिनयानंतरही.

निष्कर्ष: एक महत्त्वपूर्ण कथा, खराब सांगितली

फुले मध्ये एक ऐतिहासिक चित्रपट बनण्याची क्षमता होती, ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांची कथा व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत, अशा वेळी जेव्हा जाती आणि समानतेवरील चर्चा महत्त्वपूर्ण आहे. परंतु, महात्मा फुले यांचे दडपलेले आणि अनैतिहासिक चित्रण एक दडपलेल्या व्यक्तीऐवजी क्रांतिकारी म्हणून, इतर पात्रांवर अवास्तव लक्ष, लहुजी वस्ताद साळवे यांचे न-आकर्षक चित्रण, आणि फुले यांच्या वारशातील महत्त्वपूर्ण पैलूंचा वगळणे—जसे की हंटर शिक्षण आयोगाला पत्र, शिवाजीच्या समाधीचा शोध, शिवजयंतीची सुरुवात, टिळक आणि आगरकरांना समर्थन, आणि शेतकऱ्यांसाठी वकिली—यामुळे ही एक गमावलेली संधी ठरते. १२ सेन्सॉर बोर्ड कट्स, ज्यांनी चित्रपटाची ऐतिहासिक धार कमी केली, आणि प्री-रिलीज वाद ज्यांनी गटांना शांत करण्यात किंवा चर्चा निर्माण करण्यात अपयश मिळवले, यामुळे त्याचा प्रभाव आणखी कमी झाला. कमकुवत छायाचित्रण, प्रेरणाहीन संवाद आणि संथ पटकथेसह, चित्रपट त्याच्या सन्मानित जोडप्याला न्याय देत नाही.

फुले यांच्याशी अपरिचित असलेल्यांसाठी, फुले त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेण्याचा प्रारंभ बिंदू असू शकतो, परंतु तो त्यांना पात्र असलेल्या शक्तिशाली श्रद्धांजलीपासून खूपच कमी पडतो. त्यांच्या वारशात रस असलेल्या प्रेक्षकांना ज्योतिराव फुले यांच्या स्वतःच्या लेखनांचा, जसे की गुलामगिरी, त्यांचा शिवाजी पोवाडा, किंवा हंटर शिक्षण आयोगाला पत्र, किंवा प्रादेशिक चित्रपटांमधील अधिक सूक्ष्म चित्रणांचा, जसे की २०२४ चा मराठी चित्रपट सत्यशोधक, अभ्यास करणे चांगले ठरेल. शेवटी, फुले हे स्मरण करून देतात की सर्वात प्रेरणादायी कथांनाही प्रेक्षकांशी संनादण्यासाठी कुशल कथाकथनाची आवश्यकता आहे.

– मृणाल ढोले पाटील

रेटिंग: २/५ ⭐⭐

एसटीचा प्रवास येथे महागला! तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ होणार; एसटी महामंडळाची मोठी अपडेट

0

परळ आणि प्रभादेवी परिसरास पूर्व-पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बससेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्याने तिकीटदरात एक टप्प्याने वाढ होणार असल्याने तिकीटदर १० रुपये वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातून देण्यात आलेली आहे. सध्या परळ व प्रभादेवी परिसरात पूर्व-पश्चिमेला जोडणारा एल्फिन्स्टन पूल तोडून नव्या उड्डाणपुलाचे आणि वरळी- शिवडी- वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. एल्फिन्स्टन पूलमार्गे जाणारी परळ आगाराची वाहतूक इतर मार्गावर वळवून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

परळ आगारात दादर येथून जाताना सध्या सुरू असलेल्या मार्गावरील वाहतुकीत बदल करून एसटी महामंडळाच्या बस मडके बुवा चौक (परळ टी.टी. जंक्शन) सरळ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने- कृष्णनगर जंक्शन- परळ वर्कशॉप- सुपारी बाग जंक्शन- भारत माता जंक्शन- संत जगनाडे चौक उजवे वळण घेऊन साने गुरुजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिजवरून कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन)वरून उजवे वळण घेऊन एन. एम. जोशी मार्गाने परळ आगारात दाखल होतील आणि त्याच मार्गाने परत मार्गस्थ होतील.

‘यशवंत’ प्रकरणी मोठा ट्विस्ट; राज्य बँकेच्या ताब्यातच ५० कोटीच्या मशिनरी गायब शेतकऱ्यांच हे मोठं पाऊल

0

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विकून कारखाना उभा करण्याचा घाट यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी घातला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून राजकारण तापलं आहे.कारखान्याची प्रस्तावित शंभर एकर जमीन हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती यांना विक्री करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात शेतकरी सभासद कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे. संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. 20 जूनला याबाबतची सुनावणी होणार आहे.शेतकरी सभासद कृती समितीच्या वतीने विकास लवांडे, लोकेश कानकाटे, सागर गोटे, राजेंद्र चौधरी या सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

यशवंत कारखाना संस्था ही वर्ष २०१२-१३ पासून आजतागायत बंद आहे. २०१७ मध्ये संस्था अवसानात काढण्यात आली व पुढे २०२२ मध्ये अवसायन रद्द होत २०२४ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक झाली. या सर्व कालावधी दरम्यान संस्थेचे नेमकी देणी किती आहेत व संस्थेची येणे किती आहे याबद्दल कोणताही ठोस स्वरूपाचा अहवाल उपलब्ध नाही.

संस्थेचे राज्य सहकारी बँकेला किती रक्कम देणे बाकी आहे यातही तफावत आहे. संस्थेची संपूर्ण मालमत्ता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात होती. ती परत घेताना कारखान्याची मशीनरी व इतर सामग्री यात आता मोठी तफावत आहे. मोठ्या प्रमाणात मशिनरी गायब झाल्याने तब्बल ५० कोटी रुपयांचे सभासद शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. पांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

सभासदांनी दाखल केलेल्या याचिकेची पहिली सुनावणी न्यायमूर्ती ए. एस.चांदुरकर व न्यायमूर्ती मिलिंद साठे या खंडपीठापुढे झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ‘एफआरपी’ याचिकेतील यशस्वी वकील ऍड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली. पहिल्या सुनावणीत, शेतकऱ्यांनी या पूर्वी दाखल व निकाली झालेल्या याचिकेतील अंतरिम आदेश व निकाल निदर्शनास आणून दिला.

संस्थेच्या पूर्वीच्या संचालक मंडळांनी केलेल्या आर्थिक अपहार प्रकरणी वर्ष २०१३-१४ पासून संचालकांकडून तब्बल १४ कोटी रुपये व त्यावरील व्याज येणे आहे. त्याबाबत वसुलीसाठी प्रादेशिक साखर संचालकांचे आदेश झाले होते; मात्र रक्कम वसुलीसाठी आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. मागील रक्कम, येणे बाकी रक्कम तसेच साखर विक्रीतून वर्ष २०११-१२ मधे प्राप्त झालेले वीस कोटी रुपये राज्य सहकारी बँकेत जमा करण्यात आले आहेत.

याचाही हिशोब जुळत नसल्याने सकृतदर्शनी यशवंत सहकारीला काहीच देणे लागत नाही, असेही न्यायालयास निदर्शनास आणून देण्यात आले. सर्व बाबींचा विचार करता कोर्टाने याबाबत संबंधित सर्व प्रतिवादी यांना कोर्ट नोटीस जारी करत या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी नियोजित निर्धारित केली आहे. राज्यसरकार तर्फे ॲड वाळिंबे व इतर प्रतिवादी यांच्या वतीने ॲड. अभिजित कदम , ॲड. प्रसाद आव्हाड यांनी बाजू मांडली.

दहशतवादी हल्ल्याचे एकीकडे सावट अन्‌ दुसरीकडे स्थानिकांची पैशांसाठी अडवणूक, जबरदस्ती दगडफेक!

0

पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी आम्ही अर्ध्या तासाच्या अंतराव होतो, दरड कोसळल्यामुळे पुन्हा पहलगामला पोचलो, तेथेही हॉटेल व्यावसायिकांनी मनमानी करून हॉटेलचे, जेवणाचे दर वाढवले. जीव मुठीत घेऊन रात्र काढली, दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो, तेव्हा स्थानिक लहान मुले आमच्या वाहनांवर दगड मारत होते. जम्मूला पोचण्यापूर्वी ड्रायव्हरने रात्रीच्या सुमारास घाटातील अंधारात वाहने थांबवून जादा पैशांची मागणी केली. अशा अनेक संकटांना सामोरे जात, भितीच्या छायेमध्ये आम्ही ४८ पैकी ४० तास सलग प्रवास करून मुंबईमध्ये पोचलो आणि जीव भांड्यात पडला ! पर्यटनासाठी जम्मू व काश्‍मीरला गेलेल्या पुणेकरांना आलेला हा अनुभव अक्षरशः अंतर्बाह्य हादरवून टाकणारा ठरला.

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्यासह पाच जणांचे कुटुंब जम्मू व काश्‍मीरच्या सौंदर्याचा अनुभव लुटण्यासाठी १६ एप्रिलला तिकडे गेले होते. 3 दिवस तेथील पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासावेळी नेमके दरड कोसळल्याने लष्कराने महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. तेथील हॉटेल व्यावसायिकांनी तत्काळ हॉटेलमधील निवास व खाण्यापिण्याचे दर प्रचंड वाढविले. त्यावेळी कोणाचीही मदत पारगे व त्यांच्यासमवेतच्या लोकांना मिळाली नाही. त्यामुळे रस्त्यावर राहण्यापेक्षा पुन्हा एकदा पहलगाममधील हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी ते पोचले. तिथेही पुन्हा तोच असहकार्याचा अनुभव त्यांना आला. शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सर्वजण सोफोने माघारी फिरण्याशिवय पर्याय नव्हता. तब्बल ८० किलोमीटरचा प्रवास करून २१ एप्रिल रोजी सर्वजण पहलगाममध्ये पोचले.

तिथे कशीबशी रात्र काढून, पहाटे पाच वाजता सर्वजण दोन वाहनांमधून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. ५० किलोमीटर अंतर कापल्यानंतर पुन्हा वाहतूक कोंडीमध्ये त्यांची वाहने अडकली. पहलगाम सोडून फक्त अर्धा तासच झाला, त्याचवेळी पारगे यांना पुण्याहून आप्तेष्टांचे फोन आले. पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे व त्यांची काळजीपोटी विचारपूस करण्यात आली. पारगे यांच्या शेजारीच राहणाऱ्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचे त्यांना कळले. त्यानंतर दोन्ही वाहनांमधील सर्वजण अक्षरशः हादरून गेले. जम्मू विमानतळाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यावेळी स्थानिक लहान मुले पर्यटकांच्या वाहनांवर दगड मारत होते. आता मात्र सगळेच घाबरले.

पारगे सांगत होते, “कधी काय होईल सांगता येत नव्हते. आम्ही सर्वजण घाबरलो होतो. अनेकांशी संपर्क साधला, सरकारी यंत्रणा तर दूरच स्थानिक नागरिकही मदत करत नव्हते. इतकेच नव्हे, तर आम्हाला घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ड्रायव्हरने रात्रीच्या अंधारात घाटामध्ये वाहने थांबवून 15 हजार रुपयांची मागणी केली. त्यांना पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता. 22 एप्रिल रोजी कसेबसे जम्मूला पोचलो, त्यावेळी आमचे हॉटेलमधील बुकींगही रद्द करण्यात आले होते. विमानाचे तिकीटही अव्वाच्या सव्वा वाढले होते. त्यामुळे तर मनात आणखीनच भिती दाटली. आमच्या परिवारातील महिला, मुले हवालदिल झाले होते.बऱ्याच प्रयत्नांतर विमानाचे तिकीट मिळाले. २१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेला आमचा प्रवास २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मुंबईत संपला. तेथून पुढे आम्ही मुंबईला पोचलो. जम्मू व काश्‍मीरला आम्हाला आलेला हा जीवघेणा अनुभव कधीच विसरता येणार नाही.