महाराष्ट्रावर पुढचे दोन दिवस ट्रिपल संकट, घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट

0
5

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वातावरणामध्ये अचानक मोठा बदल पहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यात जरी हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

विदर्भात पावसाचा इशारा

पुढील दोन दिवस भारतीय हवामान विभागाकडून विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर,अमरावती, यवतमाळ अकोला, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. याच काळात वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा देखील सुटणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पाऊस सुरू असल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होत नाही, उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, अता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  गणेशोत्सवात मेट्रोचा मोठा धमाका! अनंत चतुर्दशीला ४१ तास सेवा अन् यंदा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा; वाहतूक कोंडीपासून सुटका

राज्यावर ट्रीपल संकट

दरम्यान हवामान विभागाकडून महाराष्ट्रात केवळ पावसाचाच इशारा देण्यात आलेला नाहीये, तर सोबतच वादळी वारा आणि विजांचा कडकटात असं दुहेरी संकट देखील असणार आहे. त्यात भरीसभर म्हणजे काही भागांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. वीज, वारा आणि पाऊस सोबतच काही भागांमध्ये उष्णता असं ट्रीपल संकट या काळात राज्यावर असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

वाशिममध्ये पावसाची हजेरी

वाशिम शहरासह तालुक्यातील काही भागांत आज दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  पुणे गणेशोत्सव आणखी एक संकट! पुणे रेल्वेचा 15 दिवसांचा ब्लॉक; 42 ट्रेन्स रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले, नियोजन कसे?

नागपूरमध्ये सोसाट्याचा वारा

नागपूर शहरात सोसाट्याच्या वारा सुरू आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झालं आहे, नागपूर शहराला पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नांदेडमध्ये पाऊस

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कंधार या तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढल आहे, मुदखेड, कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन या तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. काल देखील नांदेड जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

अधिक वाचा  महापालिकेत पुन्हा ५०० सुरक्षा रक्षक भरती संख्या थेट २४१५ ; ‘वाट्या’साठी सत्ताधाऱ्यांत जुंपली; १३६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च

नंदुरबारमध्येही अवकाळीची हजेरी

नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. थंड हवेचे ठिकाण आलेले तोरणमाळ आणि देवगोई घाटात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील आमचूल उद्योगाला फटका बसण्याची शक्यता आहे.